मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्योत्सव 23 फेब्रुवारी पासून कणकवलीत

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्योत्सवचे आयोजन गुरुवार 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत कणकवलीत करण्यात आले आहे. रंगभुमी वरील आघाडीचे कलावंत अतुल पेठे, पर्ण पेठे, संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष,अनिता दाते, प्राजक्ता देशमुख यांचा अभिनय पाहाण्याची संधी आपल्याला या नाट्योत्सवात मिळणार आहे. सहा दिवसात नऊ नाटकांचा हा नाट्योत्सव चालणार असून, याबाबत अधिक माहितीसाठी राजेश राज्याध्यक्ष 94216440 80 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर/ कोकण नाऊ/ कणकवली

error: Content is protected !!