तारकर्ली रस्त्यावर रस्ता खोदल्यामुळे गाड्यांचे अपघात
      मालवण(प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना सुस्थितीत असलेला तारकर्ली रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने खोदलेला आहे तो त्वरित जसा होता त्याच स्थितीत येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावा अशी मागणी तारकर्ली चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तारकर्ली गावी देशाचे पंतप्रधान मां नरेंद्र मोदी साहेब देशाचा नेव्ही डे निमित्त औचित्य साधून व मालवण मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता आले होते त्यावेळी त्यांचे आगमन तारकर्ली समुद्र किनारी होणार आणि त्यांना तारकर्ली गावाचे रस्ते अगदी टापटीप मेकअप केल्यासारखे दिसून यावेत .असा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी त्वरित बनविला . त्या कार्यक्रमाची सांगता करण्यास आलेले देशाचे आणि राज्याचे मंत्री महोदय खुश व्हावे याकरिता तात्पुरती तारकर्ली रस्त्याची मलमपट्टी करून त्यांच्या सोबत तारकर्ली वाहन चालकांना पर्यटकांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना काही दिवसांसाठी आनंदी समाधानी करून या सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी स्वतःच समाधान केलं.परंतु त्या नेव्ही डे कार्यक्रम नंतर काही दिवसातच जलजिवन मिशन यांना रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिली.त्यांनी तो रस्त्याच्या दोन्हीं बाजूंनी खोदलेला रस्ता जशास तसा न करता दोन्ही बाजूचा रस्ता सद्या कित्येक महिने तसाच अपूर्ण ठेऊन गेले त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते एक -जवळ बोट दाखवत आहेत . ते म्हणतात आमचं नाही आणि हे जल जीवन मिशन ठेकेदार आणि अधिकारी एक मेकावर बोट दाखवत नागरिकांना जो तारकर्ली रस्ता दोंनही बाजूंनी गेली वर्षांवर्षे असा रस्ता झाला नाही तो झाला त्याची अतिशय दुर्दशा होऊन रस्ता खचला असून वारोंवर अपघात होत आहेत.
या यांच्या गलथान कारभाराचा नागरिकांना मनस्ताप होऊन छोट्या मोठ्या गाड्यांना त्यांनी खोदलेल्या खड्यात वाळूत उतरल्याने छोटे मोठे अपघात होऊन मोठ्या
प्रमाणात नुकसान होत आहे.याला जबाबदार कोण सार्वजनिक बांधकाम विभाग की जल जीवन मीशन विभाग याबाबत नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर रस्ता काही वर्षा पूर्वी बनविला आणि तोच रस्ता मुदतीपूर्वी डांबरीकरण आणि क्रॉक्रीट केलेलं नदुरस्त झाला असता तो बनून घेण्याची कृज्ञता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी न दाखविता त्या ठेकेदारास पाठीशी घातले गेले.तारकर्ली रस्ता आणि रस्त्याच्या दोंन्ही कडेला लावलेल्या लाईट ब्लॉक मुळे रस्त्याला इतकी शोभा आलेली यावरून कित्येक वर्षे अशा प्रकारचां तारकर्ली रस्ता झालाच नाही असा रात्री अपरात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना भुरळ पडलेली असा तारकर्ली रस्ता तोच रस्ता खोदून रस्त्याची दुरवस्था झाली. त्याबरोबर गावाचं नाव धुळीला मिळाले आहे.यावरून असे वाटते की तारकर्ली गावी देशाचे पंतप्रधान,राज्याचे मंत्रीमहोदय महिन्यातून एक फेरी मारली तरच प्रत्येक गावचे काय तालुक्याचे काय जिल्ह्याचे रस्ते सुरळीत गुळगुळीत असतील आणि सर्व समाधानी होऊन चालतील .वाहने न डगमगता रस्त्यावर चालवतील.
पुढे पावसाळा येत आहे आणि आता होत आहे त्यापेक्षा जास्त अपघात आणि मनस्ताप वाहन चालक वाहन आणि नागरिकांना होऊ नये याकरिता मी बनविणे करिता पंधरा दिवसांची डेड लाईन दिली आहे नंतर कोणतेही सबब कारण कोणाचेही ऐकून घेतले जाणार नाही .या तारकर्ली रस्त्याचे चांगले खडीकरण करून हॉट मिट डांबरीकरण जशास तसे येत्या पंधरा दिवसात पूर्ण झाले नाही तर तारकर्ली बंदर येथे मी आणि ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार याची आगाऊ सूचना या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश बापर्डेकर यांनी म्हंटले आहे.

मालवण

error: Content is protected !!