पिंगुळीत विद्यार्थी गुणगौरव

जीवन विद्या मिशनचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, योग्य उद्धेश, सातत्याने प्रयत्न, तीव्र इच्छाशक्ति आणि ईश्वरवर नितांत श्रद्धा ठेवून कार्य केल्यास नक्की यशस्वी व्हाल असे प्रतिपादन गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात  ज्येष्ठ प्रबोधक  शिवाजीराव पालव यांनी केले. “जीवनविद्या मिशन कुडाळ शाखा” आणि “सदगुरूकृपा मसाले आणि पिकल प्रॉडक्ट्सच्या” वतीने दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पिंगुळी शेटकरवाडी येथे सुनिल पालव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमूख पाहुणे लक्ष्मीकांत परब सौ. माधुरी परब (अमेरिका), माजी सैनिक सूर्यकांत पालव, माजी वीज कर्मचारी जयवंत गावडे, सेवानिवृत्त एस टी चालक प्रमोद धुरी, उद्योजक समीर दळवी, प्रसाद दळवी, सामाजिक कार्यकर्ते सुनील पालव, ग्रामपंचायत सदस्य महेश पालकर, नूतन गावडे, विश्वजित पालव, कथक विशारद नृत्यागना मृणाल सावंत, सौ पालव, शेटकरवाडीतील ग्रामस्थ महीला वर्ग गुणवंत विद्यार्थी आदी उपस्थित होते.
     यावेळी ज्येष्ठ प्रबोधक श्री पालव, मुंबई यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, योग्य उद्धेश, सातत्याने प्रयत्न, तीव्र इच्छाशक्ति आणि ईश्वरवर नितांत श्रद्धा ठेवून कार्य केले तर आपण जीवनात नक्की यशस्वी होऊ. कोंकणातील मूले हुशार व बुद्धिमान आहेत. त्याना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाली तर निच्छित ध्येय साधू शकतील. यासाठी जीवनविद्या मिशन तरुणाना योग्य मार्गदर्शन देण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यात पालकानी सहभागी होउन सहकार्य करावे असे आवाहन  त्यानी केले.
या कौतुक सोहळ्यालाा एकूण 30 विद्यार्थी आणि पालक यांचा सन्मानपत्र, सर्वांसाठी जीवनविद्या पुस्तक, भेटवस्तू आणि रोपटे देऊन गौरव करण्यात आला यामध्ये दहावी गुणवंत विद्यार्थी अनुष्का सावंत, प्रणय सावंत, पार्थ  सावंत, आर्यन  सावंत, दीपश्वी पालकर, शुभम  हुँदरे, साक्षी  गावडे, प्रीती  सावंत, केतन  पालव, तनिषा दळवी, अथर्व  राऊळ, विराज परब, तेजल पिंगुळकर, स्मृती पिंगुळकर,दक्षता पिंगुळकर,  तृषा  वारंग,  पूर्वा वारंग, साईश गावडे बारावी, संकेत गावडे, प्रणय पालकर, सुनिता पालकर, महेंन्द्र गावडे, विकांत गावडे, दिव्या परब, भास्कर  सावंत, निशांत सावंत, याचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल पालव यानी केले तर श्री प्रसाद दळवी यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश समजावून सांगितला. तसेच पालकांचे व विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले तर दर महिन्याला एक दिवस अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल असे जाहीर केले. या कार्यक्रमात  श्री प्रसाद दळवी आणि शेटकरवाडीतील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!