दहीहंडी उत्सवात पिंगुळीवासियांची एकजूट ; यंदा एकच दहिहंडी

मान्यवरांची यशस्वी शिष्टाई

सरपंच अजय आकेरकर यांचा पुढाकार

कुडाळ : दहीहंडी उत्सवात पिंगुळीवासियांनी एकजूट दाखवत यंदा एकच दहीहंडी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मान्यवरांनी यशस्वी शिष्टाई केली. सरपंच अजय आकरेकर यांचा पुढाकार महत्वाचा ठरला.
दहिकाला उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपारिक वारसा असणाऱ्या या सणाला युवा वर्ग मोठ्या संख्येत सहभागी होत असतो. पिंगुळी गावा मधे गेली तिन वर्षे एकच दहीहंडी साजरी केली जात होती. परंतु गेल्या वर्षी काही युवा मंडळाकडून स्वतंत्र दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
पिंगुळी गावात एकच मोठी मानाची दहिहंडी असावी अशी बर्‍याच मान्यवर व्यक्तीची इच्छा होती. त्या साठी सरपंच अजय आकेरकर यांनी पुढाकार घेवुन पिंगुळीतील सर्व मंडळाची एकत्रीत बैठक आयोजित करुन गावातील मान्यवर व्यक्तीच्या समक्ष मंडळाचे समज-गैरसमज, त्रुटी दुर करण्यात आल्या. यापुढे गावात एकच दहीहंडी उत्साहात साजरी करण्याचे सर्वानुमते ठरले.
यावेळेस सरपंच अजय आकेरकर, सदस्य शशांक पिंगुळकर, मिलिंद परब, प्रदीप माने, धीरज परब, सागर रणसिंग, सतिश धुरी, राजन पांचाळ, राघोबा धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सखे सोबतीचे सतिश माडये, भुषण तेजम, मंगेश चव्हाण, अमित तेंडुलकर, प्रिय दर्शन कुडव, वड गणेश मित्र मंडळाचे दत्ता पाटील, स्वस्तिक प्रतिष्ठानचे सचिन गुंड, चेतन राऊळ, सिद्धीविनायक मंडळाचे रोहन परब, युवा प्रतिष्ठानचे केतन शिरोडकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता. यावर्षी गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!