श्रीधर नाईक यांचा विचार पुसण्यासाठी त्यांची राजकीय हत्या केली!

श्रीधर नाईक यांच्या 34 व्या स्मृतिदिनी विविध मान्यवरांची श्रीधर नाईक यांना श्रद्धांजली

गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त व ज्येष्ठ शेतकऱ्यांचा करण्यात आला सत्कार

श्रीधर नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक विचार होता. हा विचार पुढे नेण्याचे काम आपण केले पाहिजे. काही अपप्रवृत्तीने हा विचार हत्या करून संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे सुपुत्र सुशांत नाईक माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह नाईक कुटुंबीय हा विचार राजकीय व सामाजिक जीवनाच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. व या विचारासाठीच आपण सारे जण गेली 34 वर्ष या ठिकाणी एकत्र येत आहात. त्यामुळे अशा विचाराला पुढे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा. असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. कणकवली येथे श्रीधर नाईक यांच्या 34 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, लोकसभा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद रेगे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, रत्नागिरी संपर्कप्रमुख सहदेव पेटकर, अरुण भोगले, संदीप सुखठणकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक संकेत नाईक, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले. यावेळी सेवेतून निवृत्त झालेल्या मान्यवरांचा तसेच गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!