७५ वर्षांनी तेरवणमध्ये पोचली लालपरी
आंबोली ते तेरवण मार्गावर ७५ वर्षांनी पहिल्यांदाच लालपरी धावली.तेरवण गावात आलेल्या पहिल्या लालपरीचे तुकाराम गवस, शंकर गवस, नामदेव गवस, पांडुरंग सखाराम गवस, पांडुरंग रामा गवस, वासुदेव गवस, दत्ताराम गवस, दत्ताराम कांबळे, मारुती गवस, जानू गवस, गोपाल गवस, जयराज गवस व इतर ग्रामस्थांनी पूजा व आरती करुन स्वागत केले. तेरवणवासीयांसाठी हा क्षण अभूतपूर्व, अविस्मरणीय आणि आनंददायी होता.