कणकवली कॉलेज कणकवली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर
कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय + दोन स्तर विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे तसेच पर्यवेक्षक प्रा. ए.पी. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. के.जी.जाधवर ,व्यावसायिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही.. सी.सावंत, प्रा. व्ही. आर. सावंत, सहा. कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ.व्ही.एस. सावंत , प्रा. सौ. पी. एम. सावंत ,प्रा. ढवळे सर उपस्थित होते.
प्रा. के.जी .जाधवर म्हणाले, शिक्षकाचे चांगले गुण आत्मसात करा व एक चांगला नागरिक बनण्याचे प्रयत्न करा. एनएसएसच्या माध्यमातून एक व्यक्ती म्हणून घडण्याचे शिक्षण मिळते, असे त्यांनी प्रतिपादन केले .पर्यवेक्षक प्रा. ए.पी.चव्हाण म्हणाले की ,शिक्षक व्यक्तिमत्व घडवत असतो.विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना योग्य ती दिशा दाखवत असतो. प्रा. हरिभाऊ भिसे आपल्या मनोगतात म्हणाले, गुरुला शिष्याच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. कारण प्रत्येक मुलांमधील असलेले विविध गुण जाणून त्यांना मार्गदर्शन व सुसंस्कार गुरुच करू शकतो. समाजातही गुरुला आदराचे- मानाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांना घडवून प्रगतिशील व आदर्श समाजाची जडणघडण करण्याचे महान कार्य शिक्षकच करीत असतात. प्रास्ताविकामध्ये प्रा. .व्ही.एस. सावंत यांनी शिक्षक म्हणजे अज्ञानाच्या अंध:कारात तेवणारी ज्योत आहे, असे प्रतिपादन केले. तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ज्ञानाबरोबरच सौजन्याची जोड दिली,त्याचप्रमाणे आपण सौजन्यशील बनले पाहिजे,असे आवाहन केले. दुर्वा गोवेकर, जय जाधव, तस्मिन शेख या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्यांनी आजच्या उपक्रमाचे कौतुक केले व महाविद्यालयाकडून सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पुजनाने झाली. मान्यवरांचे तसेच प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. व्ही. एम. महाडेश्वर, प्रा. पी.पी.सावंत , प्रा. एम. जे. कांबळे. तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही.सी.सावंत यांनी केले व आभार विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश आढाव यांनी मानले.