ग्राहकांनी नेहमी जागृत राहिले पाहिजे – श्री.प्रसंन्नजित चव्हाण

 प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करीत असते. अशावेळी ग्राहक म्हणून आपण नेहमी आपल्या हक्काविषयी जागृत असले पाहिजे असे मत वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रसन्नजीत चव्हाण यांनी व्यक्त केले.

वैभववाडी तहसील कार्यालयात वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली “जागतिक ग्राहक हक्क दिन” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन. पाटील, सचिव श्री.संदेश तुळसणकर, तालुकाध्यक्ष श्री. कुमार स्वामी, वैभववाडी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. रत्नाकर कदम व माजी अध्यक्ष व नगरसेवक श्री.मनोज सावंत उपस्थित होते.
वैभववाडीचे तहसीलदार श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हणाले, . ग्राहक चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे. यासाठी समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी सभासद होवून या पवित्र कार्याला हातभार लावला पाहिजे असे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा. श्री. एस. एन. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
वैभववाडीमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला असून यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. रत्नाकर कदम यांनी केले. वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सामाजिक चातुर्मास संदर्भग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. कै.अरुण भार्गवे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कोकण विभागाचा पहिला ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२२ वैभववाडी येथील ग्राहक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. एस.पी.परब यांना देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पुरवठा अधिकारी श्री. रामेश्वर दांडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे जिल्हा सचिव संदेश तुळसणकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.पी.परब यांनी केले.

error: Content is protected !!