स्व.गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर 14 एप्रिल रोजी कुडाळ येथे ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन व वितरण सोहळा

मुंबई – वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,ॠषीतुल्य प्रज्ञावंत,गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील विख्यात चरित्रकार, इतिहासकार आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सन १८८३ ते १९३५ या कालखंडात २३ चरित्रे लिहिली, लोकमान्य टिळकांच्या अगोदर भगवद्गीता गुरूवर्यांनी लिहिली.चरित्रांपैकी गौतम बुद्ध, संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषांचे मराठीतील पहिले महान चरित्रकार होऊन गेले. गुरूवर्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास आर्थिक मदत मिळवून दिली.त्यामुळे डाॅ.बाबासाहेब बॅरिस्टर होऊन मायदेशी परतले. गुरुवर्यांनी लिहिलेल्या सात हजारांहून अधिक पृष्ठांपैकी काही पृष्ठे जमा करून साहित्य संस्कृती मंडळातर्फे ११ खंड तयार करण्यात आले. त्या खंडाचे दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वा. महालक्ष्मी सभागृह (मंगल कार्यालय) कुडाळ येथे पुनर्प्रकाशन प्रा.राजन गवस (संपादन- स्व.गुरूवर्य कृष्णराव अ. केळुसकर ग्रंथसंपदा) व प्रा.दिनेश पाटील,(सदस्य, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. साहित्यिक व सिंधुदुर्ग वासियांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संयुक्त कार्यवाह किरण नाईक यांनी केले आहे.