कणकवली नगरपंचायतीसाठी गेल्या पाच दिवसात एकही अर्ज दाखल नाही

निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांची माहिती

कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीसाठी 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या पाच दिवसात कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीकरिता 17 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून थेट निवड केली जाणार आहे. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार असून 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री देशपांडे यांनी दिली. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी असून यामध्ये शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत. रविवारी 16 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिवस असणार आहे. पहिल्या पाच दिवसांमध्ये नामनिर्देशन पत्र आलेली नसल्याने आता शेवटच्या दोन दिवसांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे.

error: Content is protected !!