कलमठ साठी स्वतंत्र फिडर द्या, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन!

कलमठ ठाकरे शिवसेनेचा महावितरण अधिकारी यांना इशारा

सातत्याने ठप्प होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत संतप्त भूमिका

गेली कित्येक वर्ष आम्ही शिवसेनेच्या वतीने कलमठच्या वीज समस्येबाबत आपल्या विभागाकडे आवाज उठविलेला आहे. कलमठ गावचे जवळजवळ शहरीकरण झाले आहे. कलमठ मध्ये आता विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दिवसाआड लाईट ये-जा चालू असते. हे कित्येक वर्षे चालू आहे.
कलमठ गाव हे खारेपाटण फिडरला जोडलेले असल्यामुळे या फिडरवरील कुठल्याही गावात प्रॉब्लेम झाल्यास कलमठ मधील विजेवर याचा सतत परिणाम होत असतो. त्यामुळे खारेपाटण फिडरचे दोन भाग करुन कलमठ फिडर वेगळा केल्यास दोन्ही फिडरला सोयीचे होईल. त्यामुळे या गोष्टीवर विचार करुन लवकरात लवकर कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना कलमठ आणि ग्रामस्थ यांच्यामार्फत १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत. तरी याची तात्काळ नोंद घ्यावी. असा इशारा ठाकरे शिवसेनेचे कणकवली तालुका संघटक राजू राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी उपतालुका प्रमुख -जितेंद्र कांबळे, विलास गुडेकर, आशीष मेस्त्री, अविराज खांडेकर, सचिन पवार,आदित्य पालव आदी उपस्थित होतें.

error: Content is protected !!