कुडाळ कवठी ते चिपी बस फेरी तात्काळ सुरु करा

कवठी सरपंच यांची आगार प्रमुखांकड़े निवेदना मार्फ़त मागणी

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ कवठी ते चिपी बस तात्काळ सुरु करा अशी मागणी कवठीवासियांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली कवठी सरपंच स्वाती करलकर आणि ग्रामस्थांनी तसे निवेदन कुडाळ आगार प्रमुखांना आज दिले.
कुडाळ आगार येथून सुटणाऱ्या गाड्या वेळेत जात नसल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषद् उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शानाखाली आणि कवठी सरपंच स्वाती करलकर यांच्या  नेतृत्वाखाली कवठी ग्रामस्थानी  कुडाळ एस टी आगाराला भेट आज भेट दिली. कुडाळ बसस्थानकातून संध्याकाळी 6.40 वाजता सुटणारी कुडाळ दुतोंड गाडी बंद करण्यात आली आहे ती पुन्हा चालू करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थी तसेच एमआयडीसीत कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे एसटी नसल्याने दोन तास हाल होतात ते थांबतील. तसेच सकाळी हि बस नसल्याने सकाळच्या गाडीला गर्दी होते. त्यामुळे विद्यार्थी, कामगार प्रवाशांना गाडीतुन प्रवास करता येत नाही. त्यामुळे कुडाळ कवठी ते चिपी अशी बस सुरू करावी .
कुडाळ डेपोमधून दुपारी सुटणारी 1.30 वाजताची बस फेरी वेळेत सुटत नसल्याने विद्यार्थी वर्गाला त्रास होत आहे. ही बस फेरी वेळेत सोडावी अशी मागणी देखील यावेळी कवठी सरपंच यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बसफेऱ्याबाबत इतरही  विविध विषयांवर  यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. दरम्यान याबाबत  लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल  असे आश्वासन यावेळी कुडाळ आगाराच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यावेळी कवठी ग्रामपंचायत सदस्य  प्रमोद नाईक, माजी पंचायत समिति सदस्य संदेश नाईक, माजी उपसरपंच भरत मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय  खडपकर, भाजपा युवा कार्यकर्ते दादा करलकर  आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!