सह्याद्रीलगतच्या माणगाव पट्ट्यात गारपीटीसह अवकाळी पावसाचे धुमशान

आंबा, काजू, जांभूळ पिकांचे मोठे नुकसान

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसाने काही भागात हजेरी लावली. याचा परिणाम आंबा, काजू, जांभूळ पिकावर होण्याची शक्यता आहे. आज दिवसभर सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून संध्याकाळी ५ च्या सुमारास सह्याद्रीलगत असलेल्या माणगाव पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गारपीट होवून अवकाळी पावसाने हजेरी लावली.
सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे माणगाव पट्ट्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री आणि पहाटे सुद्धा सह्याद्रीलगतच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. तर आज संध्याकाळी कुडाळ तालुक्याच्या माणगाव पंचक्रोशीत अवकाळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली. आज वातावरणात दुपार सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. एकंदरीत यामुळे आंबा, काजू, जांभूळ बागायतदार चिंतेत पडलेत.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!