वाडा – पालये परिसरातील अग्नी तांडवाची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी

शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू
देवगड : काल दुपारी फणसे पडवणे पालये या भागातील सुमारे ५० हून जास्त देवगड हापूसच्या बागा लागलेल्या आगीमध्ये जळून गेल्या.
या बागा जळल्याने आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबे होते कलमे जळल्याने आता पुन्हा कलमे उभी करणे अथवा कलमांना जगवणे ही गोष्ट बागायतदारांना करावी लागणार आहे.
आमदार नितेश राणे यांनी आपण याबाबत सरकारकडे भूमिका मांडून नक्कीच नुकसान भरपाई देऊ असा विश्वास दिला आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळ खडपे, तालुका अध्यक्ष अमोल तेली , बंड्या नारकर ,अरीफ बगदादी, बाळा गावकर माजी सभापती रवी पाळेकर इत्यादी उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी