पालकमंत्री असूनही भाजपचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात ही राणेंची निष्क्रियता

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा टोला
भाजपा जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांना जाब विचारायला हवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नितेश राणे हे निष्क्रिय ठरले भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री जिल्ह्याचा विकास करू शकत नाहीत व विकासासाठी निधीही देऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाल्याने शिंदे गटाकडून आमिषे दाखवून प्रवेश होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला मात्र मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यापूर्वी प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्र्यांनाच त्यांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपामध्ये या व निधी मिळवा या आश्वासनाची ओळख करून द्यायची गरज होती.भाजपच्या जिल्हाअध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करून तक्रार केल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राणे यांची कुवत नाही का? यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडव्याची पालकमंत्री यांची कार्यक्षमता नाही असे चित्र स्पष्ट होते. भाजप पक्षाचा पालकमंत्री असताना त्याच पक्षाचे कार्यकर्ते फुटतात यावरून पालकमंत्री पद सांभाळण्याची नितेश राणे यांची क्षमता नाही हे दिसून येते. भाजपचे जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्री नितेश राणे निष्क्रिय ठरले याची कबुली या पत्राद्वारे दिली.
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आमिषे दाखवून प्रवेश घेत असल्याबद्दल प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले याचा अर्थ जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभाकर सावंत यांनी देखील पालकमंत्री निष्क्रिय ठरत असल्यामुळे प्रवेश घेतलेल्या लोकांची दिलेली आश्वासने पुरी होत नाहीत त्यामुळेच हे पक्षप्रवेश शिंदे गटात होत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी अनेकदा विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने दिली व त्यांचे फसवून भाजपामध्ये प्रवेश घेतले परंतु हे प्रवेश करणारे कार्यकर्ते देखील असा समजून चुकले की पालकमंत्र्यांच्या हातून विकासाला न्याय मिळू शकत नाही म्हणूनच त्यांनी प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे पण शिंदे गटात देखील या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होणार असून शिंदे गटाला आपण जुमानत नसल्याचे सुद्धा पालकमंत्र्यांनी नुकतेच विधान केले आहे. तसेच हे प्रवेश करणारी कार्यकर्ते देखील कुठल्या एका विचारधारेची बांधलेले नसून फक्त ठेकेदारी करता हे प्रवेश होत आहेत हे सुद्धा स्पष्ट झाले आहे तसेच ठेकेदारांच्या रखडलेल्या कामांची बिले काढून देतो असे सांगून पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याभरात ठेकेदारांचे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करून घेतले मात्र आज हे ठेकेदार हवालदिल झाले असून ते सुद्धा पालकमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडले आहेत.
याआधीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समीकरण पाहिल्यास मुळात जिल्ह्यात भाजप पक्ष हा न्हवताच, भाजपची पार्श्वभूमीच अशी आहे की जिल्ह्यात भाजपने स्वताचा कार्यकर्ताच तयार केला नाही, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने देऊन भाजपने आपला पक्ष मोठा केलेला आहे. शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी याआधी उ.बा.ठा गटाचे पक्षप्रवेश दाखवले होते, ते सर्व भाजपचेच कार्यकर्ते होते हे यावरून सिद्ध होते. पालकमंत्री राणे यांनी कणकवली मतदार संघात कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने देऊन घेतलेल्या कार्यकर्त्यांची आश्वासने पुन्हा न झाल्यास त्यांचा भाजप मध्ये जाऊन भ्रमनिरास झाला आहे या भ्रमाचा भोपळा येत्या काही काळातच फुटेल.