कणकवलीत भाजपाचे महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन

छत्रपतींचा पुतळा दुर्घटनेत विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
भजन सादर करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली टीका
भारतीय जनता पार्टी कणकवली च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बुवा संतोष कानडे,बुवा प्रकाश पारकर यांनी भजन म्हणत टीकात्मक आंदोलन करण्यात आले.भजन सादर करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी.. अशा जोरदार घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत जिल्ह्यात येऊन वातावरण बिघडू पाहणाऱ्या नेत्यांचा निषेध करण्यात आला.
कणकवलीत छत्रपतींच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर विरोधक राजकारण करत असल्याच्या निषेधार्थ कणकवलीत भाजप ने आंदोलन केले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,जिल्हा चिटणीस संतोष कानडे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत,माजी उपसभापती प्रकाश पारकर,माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर , संतोष पुजारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, अण्णा खाडये, समीर प्रभूगावकर, गणेश तळगावकर ,माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, राजू पेडणेकर ,शैलेश सुर्वे परशुराम झगडे,संदीप सावंत,बबलू पवार, चिन्मय तळेकर, सागर पवार, श्रेयस चिंदरकर, अभय गावकर, प्रशांत राणे ,विजय इंगळे, बाबू नारकर,प्रसाद देसाई, मंदार मेस्त्री ,महेश मेस्त्री, रोहित ठाकूर, अनिल घाडीगावकर,सर्वेश बागवे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर म्हणाले,राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकारण करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, त्यानंतर देखील विरोधक राजकारण करत आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन शिवप्रेम विरोधकांनी दाखवण्याची गरज नाही. गड किल्ले व छत्रपतींचा इतिहास जागृत ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत.ज्यावेळी विशालगडावर अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न चालू होता,त्यावेळी तुम्ही कुठे होता? कर्नाटक मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला. त्यावेळी तुम्ही कुठे होता? हा अपघाताने पुतळा पडलेला आहे, त्यावर राजकारण करण्याची गरज नाही.या घटनेबाबत राज्यातील जनता विरोधकांना माफ करणार नाही.विरोधकांनी या ठिकाणी येत सातत्याने राजकारण केल्यामुळे ही बातमी देशभर पसरण्याचं काम करत छत्रपतींच्या अपमान विरोधक करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून देईल, हा अपमान छत्रपतींचा असल्यामुळे तुम्हाला जनता सोडणार नाही असा इशारा दिला.
या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेत्यांचे निषेध व्यक्त करणारे फलक व भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कणकवली प्रतिनिधी