वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेती नुकसानी : 14 जुलै रोजी ओरस येथे बैठक

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व उप वन संरक्षक श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वन्य प्राण्यांपासून होणारे शेती नुकसान व त्यावर उपाययोजना या विषयी शुक्रवार दि. १४ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे सभा आयोजित करण्यात आलीआहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वना बरोबरच खाजगी वनाचे क्षेत्र ८५% आहे. त्यामुळे जिल्ह्यात वन्य प्राण्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. हत्ती, माकड, डुक्कर, साळींदर, गवा रेडे, वनगाय, शेकरू या सारख्या वन्य प्राण्यांपासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला मिळत नाही व नुकसानीचे मोजमाप सुद्धा योग्य प्रकारे होत नाही. या उपद्रवी प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी आपली शेती मोठ्या प्रमाणात पड ठेवू लागले आहेत. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेती नुकसानी बाबत उपाययोजना आखण्यासाठी अधिकारी, शेतकरी व सामाजिक संस्था प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन ब्रिगे. सुधीर सावंत यांनी केले आहे. तसेच या सभे दरम्यान कृषी प्रतिष्ठान आयोजित वृक्ष लागवड अभियान – २०२३ बाबत आढावा व पुढील नियोजन या विषयी चर्चा करण्यात येईल. अशी माहिती भास्कर काजरेकर वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसयांनी दिली आहे.

ओरस प्रतिनिधी

error: Content is protected !!