कोमसाप मालवण शाखेचा ‘ माझे आजोळ माझी देवभूमी’ लेखन मालिकेचा सांगता समारोह थाटात संपन्न

२४ मार्च १९९१ या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोकणचे सुपूत्र पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषदेचे ‘ रोप लावले. ठाणे,रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून कोमसापच्या या चारही जिल्ह्यात साठहून अधीक शाखा निर्माण झाल्या आहेत.कोमसाप चा एक विराट व विशाल वटवृक्षच तयार झालेला आहे.

यातीलच एक शाखा म्हणजे ‘कोमसाप मालवण ‘ही शाखा. या शाखेचे अध्यक्ष सन्माननीय श्री.सुरेश ठाकूर सर. यांच्या कल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे गेले वर्षभर विवीध अनेक कार्यक्रम नियमीत होत आहेत. त्यातीलच एक या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे मे महिन्याच्या १८ ता. पासून ‘माझे आजोळ,माझी देवभूमी ‘ या विषयावर लेखन करणे हा होता.यात अकराजणानी आपापल्या आजोळच्या देवभूमीचे सुंदर वर्णन करून साहित्यात मोलाची भर घातली. यात नारायण धुरी, वैजयंती करंदीकर, देवयानी आजगावकर,वर्षाराणी अभ्यंकर,माजी शिक्षणाधिकारी सदानंद कांबळी…..अशा अकरा जणांचा समावेश होता.आदिती मसुरकर यानी आपल्या गोव्यातील आजोळचे बहारदार वर्णन सादर केले.पूर्वा खाडीलकर,शिवराज सावंत,दिव्या परब व आशोक कांबळी यांनी अगदी खुमासदार शैलीत आजोळची ओळख करून दिली.सरते शेवटी श्री.विठ्ठल लाकम सरांनी एकेकाळची वैभवशाली संतपीठाची भूमी असलेल्या मसुरे या आजोळची
महती आपल्या लेखनातून सादर केली. या कार्यक्रमात एक कविता वाचनाचाही कार्यक्रम झाला.त्यात अनघा नेरूरकर,रसिका तेंडोलकर.बाबू घाडीगांवकर, बाळ धुरी व विठ्ठल लाकम यांच्या कवितांचे वाचन झाले.
या समारंभाची सांगता ३० मे २०२३ दिवशी हर्षोल्हासात संपन्न झाली. या सांगता समारोहात कोमसाप मालवण चे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक गुरुवर्य श्री. सुरेश ठाकूर यांचा
स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेला परीसस्पर्श, कार्यक्रमाध्यक्ष दैनीक लोकसत्ताचे भुतपूर्व वार्ताहर श्री. आत्माराम नाटेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे संकलन व संचलन श्री. गुरूनाथ ताम्हणकर यांनी नेहमी प्रमाणेच सुश्राव्य व दिमाखदारपणे सादर केले कोमसाप मालवणच्या कारकिर्दीतला सोन्याच्या अक्षरांनी कोरून ठेवावा असाच अविस्मरणीय दिवस ठरला.

error: Content is protected !!