बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोटींची उड्डाणे पण ३१ मार्चला सुमारे २० कोटींची उपेक्षा

रत्नागिरी पर्यंत आलेला निधी पुढे कसा पोहोचला नाही?

जिल्ह्यातील ठेकेदार लॉबीमध्ये कुजबुज

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना यावर्षी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकास निधी देखील मोठ्या प्रमाणात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ह्या कोटींच्या उंडाणांमुळे येत्या काळात अनेक रस्ते देखील अगदी गुळगुळीत होतील अशी अपेक्षा येथील जनतेला आहे. मात्र ज्या कामांना मागील आर्थिक वर्षात मंजुरी मिळाली व मंजुरी नंतर ही कामे ठेकेदाराने केली परंतु त्याची बिले काही ठेकेदारांना अद्याप मिळालेली नाहीत. 31 मार्चला रात्री उशिरापर्यंत निधी जमा होईल या आशेवर रात्र जागवत असलेले कणकवली विभागातील अनेक ठेकेदार मात्र या निधीच्या उपेक्षेने ताटकळतच राहिले. अशी चर्चा ठेकेदार लॉबीमध्ये सुरू आहे. जर हे खरे असले तर मग त्या कोट्यावधींच्या निधीच्या वल्गना झाल्या असताना प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षातील निधी जर अपूर्ण आला असेल तर ही कामे याच धर्तीवर झाली तर त्यांची बिले होतील काय? असा प्रश्न ठेकेदारांना पडला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 31 मार्च पर्यंत केलेल्या कामांवर निधी खर्च घालण्याकरिता अगदी 31 मार्च रोजी उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग रात्रभर जागला. इतर बाबतीत आलेला निधी वगळला तर साधारणतः रस्ते व अन्य कामं करता अपेक्षित असलेल्या सरासरी 40 पैकी अवघा सरासरी 20 कोटींचा निधी आला. तर उर्वरित 20 कोटी च्या निधी च्या तुटवड्यामुळे ठेकेदार मात्र उपेक्षित राहिले. बरं ही कामे करून झालेली असताना देखील निधी अभावी ठेकेदार हवालदिल झाले. सिंधुदुर्ग जिल्हा लगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात मात्र 31 मार्चला उशिरापर्यंत बक्कळ पैसा आल्याची चर्चा ठेकेदार लॉबीत सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांना मात्र कामे करून देखील निधी करीता बांधकाम कार्यालयांमध्ये येर झऱ्या माराव्या लागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकास निधीत कोटींच्या कोटी उड्डाणे झाली. अनेक रस्ते व अन्य योजनांच्या घोषणा झाल्या. निधी आल्याचे आकडे जनतेपर्यंत पोहोचले. मात्र केलेल्या कामांची सुमारे 20 कोटी रुपयांची रक्कम अद्याप प्राप्त झाली नसली तर कोटींची उड्डाणे करत असताना केलेल्या कामांच्या निधीचे काय? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. असे असताना नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात आलेला 31 मार्च रात्रीपर्यंत चा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा पोचला नाही? अशी देखील ठेकेदारांमध्ये कुजबुज चालू आहे. त्यामुळे या निधी अभावी कामे करूनही उपेक्षित राहिलेल्या ठेकेदारांना हा आता निधी केव्हा मिळणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!