ग्राम स्वच्छते साठी कलमठ गाव एकवटला

कलमठ ग्रामपंचायतीच्या ‘स्वच्छता संवाद ‘ कार्यक्रमाला गावातील सामाजिक मंडळांसहित ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वच्छ वाडी, स्वच्छ कॉलोनी, स्वच्छता दिंडी, स्वच्छताा प्रबोधन रिल्स स्पर्धांचे करणार आयोजन
आज कलमठ गावातील कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन साठी कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता संवाद ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ व सुंदर कलमठ साठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कलमठ गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त देत आपल्या संकल्पना, सूचना मांडल्या. १ ऑगस्ट पासून कलमठ गावात कचरा संकलन साठी वेगळे नियम करणे, संकलित कचरा विल्हेवाट लावणे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे या विविध प्रकारच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक संदीप पवार यांनी संबोधित करत कचरा विलगीकरण, व्यवस्थापनावर प्रबोधन केले, गावाचे आरोग्य आपल्याच सवयींमध्ये असून कचरा व्यवस्थापन हा विकासाच एक भाग असल्याचे यावेळी पवार म्हणाले.
सरपंच संदिप मेस्त्री बोलताना म्हणाले कलमठ गावात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या सोबत चर्चा करावी म्हणून आजच्या बैठकीला गावातील सर्व बचत गट,सामाजिक मंडळांना निमंत्रण देऊन आजच्या ‘ स्वच्छता संवाद ‘ कार्यक्रमाचे आयोजन आपण केले. येणाऱ्या दिवसात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर आपण कठोर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलणार असून त्यासाठी आपण सर्वांचे सहकार्य लाभावे आपले कलमठ गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी आपण एकत्र काम करूया ,कचरा व्यवस्थापन साठी खर्च होणारा निधी हा आपल्याच करांमधून आहे त्यामुळे आपण भरणा करत असलेला कर फक्त कचरा व्यवस्थापन वर खर्च होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घेऊया असे सरपंच संदिप मेस्त्री बोलताना म्हणाले. आज आयोजित केलेल्या स्वच्छता संवाद कार्यक्रमात गावातील ३२ सामाजिक मंडळानी सहभाग घेत चर्चा केली, सूचना केल्या. १ ऑगस्ट पासून ५ दिवस ओला कचरा तर एकदाच सुका कचरा घेतला जावा असे एकमताने ठरले. त्यासाठी कोणीही तक्रार आपल्याकडे करू नये स्वच्छता कर्मचारी सांगतील ते सरपंच म्हणून माझे आणि संपुर्ण ग्रामपंचायतीचे मत असेल असे मेस्त्री यांनी बोलताना सांगितले. स्वच्छ वाडी स्पर्धा, स्वच्छ कॉलोनी स्पर्धा, स्वच्छ कलमठ प्रबोधन रिल्स स्पर्धांचे आयोजन करावे, गावात स्वच्छता दिंडी आयोजन, स्वच्छता दवंडी फिरवणे, नव्या नियमांची अंमलबजावी करण्याचे फलक लावणे अशा प्रकारचे नियोजन केले असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना २००० हजार रुपये दंड करून त्यांचे फलक सार्वजनिक करण्याचे ठरल्याची माहिती यावेळी सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली . या नाविन्यपूर्ण स्वच्छता संवाद उपक्रमाचे ग्रामस्थानी कौतुक केले. गावातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या चर्चेत सहभाग घेतला, बचत गटांच्या महिलांनी आपण या साठी पुढाकार घेऊन महिलांमध्ये स्वच्छता प्रबोधन करू असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी केले.
या स्वच्छता संवाद कार्यक्रमाला उपसरपंच दिनेश गोठणकर ,माजी पंस सदस्य महेश लाड, माजी सरपंच निसार शेख, स्वप्नील चिंदरकर,कमलेश नरे, सदस्य पपू यादव, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, अनुप वारंग,स्वाती नारकर, प्रीती मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री, सचिन खोचरे, नजराणा शेख, हेलन कांबळे, उपस्थित होते.
यावेळी प्रभाग संघाच्या तन्वीर शिरगावकर, गुरू वर्देकर, श्रद्धा कदम, प्रकाश सावंत, मृणाल ठाकूर,अशोक कदम, संदीप म्हाडगुत, ,सुशांत राऊळ,परेश कांबळी, प्रनोती हिंदळेकर, गंगाधर कदम यांनी आपले विचार आणि सूचना मांडल्या.