किनारपट्टीवरील बांधकामाबाबत राज्य व केंद्र शासनाकडून धोरणात्मक निर्णय प्रक्रिया सुरू-मंत्री नितेश राणे

भाजपा मच्छिमार सेलने लक्ष वेधले
काल दिनांक २०जुलै रोजी मालवण येथील किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री श्री नितेश राणे यांची कणकवली निवासस्थानी भेट घेतली. किनारपट्टीवरील मत्स्य व पर्यटन व्यवसायिक तसेच निवासी घरे यांना प्रशासनाने सीआरझेड कायदा अंतर्गत नोटीसा बजावलेल्या आहेत. संदर्भित विषयात लक्ष वेधण्यासाठी मालवण मधील माजी नगरसेविका सौ सेजल परब व श्रमिक मच्छीमार संघटनेचे सन्मेश परब यांनी रविकिरण तोरसकर यांच्या समवेत शिष्टमंडळासहित पालकमंत्री श्री.नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी सदरचा विषय हा महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीचा असून याबाबत केंद्र व राज्य शासनाचा माध्यमातून धोरणात्मक निर्णय लवकरच होणार असल्याचे सांगितले .तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सदरच्या कायद्यामुळे येणारे अडथळे याबाबत सुद्धा मार्ग निघणार आहे असे सांगितले.किनारपट्टीवरील निवासी घरे ,मत्स्यव्यवसाय संबंधित जागेचा वापर तसेच पर्यटन व्यवसाय, घर दुरुस्ती , बांधणी व इतर अनुषंगिक गोष्टीसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा झाली. सदर विषयात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक भविष्यातील धोरणात्मक निर्णयामुळे किनारपट्टी समुदायाला मोठा दिलासा मिळणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्र शासन स्तरावर याबाबत आदरणीय खासदार श्री नारायण राणे साहेब आणि राज्य शासनाकडे मंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा चालू आहे. प्रशासनाने बजावलेल्या नोटिसा बाबत किनारपट्टीवरील लोकांनी चिंता करू नये लवकरच याबाबत तोडगा निघेल असे आश्वासन दिले. यावेळी नोटिसा बजावलेल्यांपैकी नागरिक उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या शिवसेना उबाठा च्या माजी नगरसेविका सौ सेजल परब व उपशहर प्रमुख सन्मेश परब यांना भाजप मधील भावी वाटचालीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोनी फर्नांडिस, कुशल गिरकर,नामदेव केळुसकर,विवि फर्नांडिस, रूपेश प्रभु व इतर उपस्थित होते.धन्यवाद 🙏