हलाल जिहाद, लव्ह जिहाद वपफबोर्ड वर शासनाकडून कठोर कारवाई करा

आचरा येथे हिंदू जनजागृती समितीने छेडले लक्षवेधी आंदोलन
आचरा प्रतिनिधी
आचरा तिठा येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हलाल जिहाद, लव्ह जिहाद, वपफबोर्ड यांवर शासनाकडून कठोर कारवाई करणारे कायदे बनविण्यात यावे या मागणीसाठी आज लक्षवेधी आंदोलन आचरा तिठा येथे छेडण्यात आले. 5 मार्च रोजी वायंगणी येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सभेत ‘महाआंदोलना’ची साद घालत आचरा येथे महाआंदोलन छेडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मंगळवारी आचरा तिठा येथे सकाळी 10.30 वाजता हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आचरा तिठ्यावर लक्षवेधी आंदोलनास सुरुवात झाली होती. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनानंतर जनजागृती समितीच्या वतीने आचरा ठाण्यात आचरा पोलिसांना निवेदन देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे आपल्या टीमसह परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते
या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा समिती समनव्यक हेमंत मणेरिकर, आनंद मोडकर, भास्कर खाडीलकर, विष्णू कदम, फ्रफुल्ल नाटेकर तसेच आचरा येथील क्रियाशील सदस्य सिद्धार्थ कोळगे, मंदार सरजोशी, मंदार सांबारी,प्रफुल्ल नलावडे, रवींद्र बागवे, वरद जोशी तसेच महिला वर्गही सहभागी झाला होता.
आंदोलनात संबोधित करताना सिंधुदुर्ग जिल्हा समिती समनव्यक हेमंत मणेरिकर म्हणाले कीं आज भारत देश आणि हिंदु धर्म यांवर विविध आक्रमणे होत आहेत. धर्मांतर, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड कायदा, भूमी जिहाद यांसह हलाल जिहादचे संकट देशावर घोंगावत आहे. हिंदू अल्पसंख्य झाले, तर या देशाचे भवितव्य गंभीर आहे. हिंदू धर्म पवित्र आहे. मात्र हेच हिंदुत्व संपविण्यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्मावर चारही बाजूनी आघात सुरू आहेत. संविधानातून हिंदूंचा घोर अपमान केला जातोय. अमृतमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या हिंदू राष्ट्रात हिंदूसाठी कायदे नाहीत, ही शोकांतिका आहे. आमच्या युवकांमध्ये राष्ट्रधर्माची जाणीव निर्माण झाली पाहिले. महिला धर्म शिक्षित व्हायला पाहिजेत. हिंदू धर्माचा अभिमान बाळगून पाश्चात्य संस्कृतीवर बहिष्कार घातला पाहिजे. देव-देवतांसह महापुरुषांचे होणारे विडंबन थांबवायला हवे. धर्मांतरित लोकांची आकडेवारी पाहिली तर एकदिवशी आपण अल्पसंख्याक होऊ. म्हणूनच हलाल जिहाद, लव्ह जिहाद, वपफबोर्ड यांवर शासनाकडून कठोर कारवाई करणारे कायदे बनविण्यात यावे या मागणीसाठी आज आंदोलन असल्याचे ते यावेळी म्हणाले.