आचरा देऊळवाडी नळपाणी योजना अवघ्या आठ दिवसात कार्यान्वित

पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

आचरा देऊळवाडीसाठी नळपाणी योजना व्हावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या भागात नेहमीच पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत होते. आज आचरा देऊळवाडी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ असा शब्द आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी ग्रामस्थांना दिला होता. त्यांनी तात्काळ निधी संकलित करत नळपाणी योजनेचे काम हाती घेतले होत. अवघ्या 8 दिवसात नळपाणी योजना कार्यान्वित करत पिण्याचे पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. या नळपाणी योजनेचा शुभारंभ सरपंच जेरोन फर्नांडीस यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, चंद्रकांत कदम,हर्षदा पुजारे, अभय भोसले,जयप्रकाश परूळेकर, अभिजित सावंत, विनिता कांबळी, सुनील मयेकर, गोविंद राणे, सौमित्र राणे
राजेंद्र राणे, प्रकाश रेनुशे, चैतन्य कांबळी, अरुण आचरेकर, प्रदिप चव्हाण, प्रकाश चव्हाण, बंडू कानविंदे, जान्हवी राणे, वंदना राणे, आनंद राणे, छाया रेनुशे, गुरु आयर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आचरा देऊळवाडी भागातील पाण्याचे स्रोत फेब्रुवारी महिना अखेर घटत असत या भागातील महिलांना दोन किलोमीटर वनवन करत दुसऱ्या भागातून पिण्याचे पाणी आणावे लागत होत. ही गरज ओळखून आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष मेहनत घेत ही नळपाणी योजना प्रत्यक्ष होण्यासाठी विशेष मेहनत घेतली व अवघ्या आठ दिवसात पिण्याचे पाणी ग्रामस्थांपर्यन्त पोहचवले आहे. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आचरा सरपंच यांचे विशेष आभार मानले. यावर्षी पाण्यासाठी भटकावे लागणार नसल्याने स्थानिक महिला समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!