त्या स्पर्धांशी भालचंद्र महाराज संस्थानचा कोणताही संबंध नाही

संस्थान कडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

त्या स्पर्धांना भालचंद्र महाराज संस्थान ची मान्यता व परवानगी नाही

परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२१ वा जयंत्योत्सव गुरुवार दिनांक १६ जाने. २०२५ ते २० जाने. २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करणेत येत आहे. हे सर्व कार्यक्रम प्रसिध्दी, फलक व कार्यक्रम पत्रिकेद्वारे जाहिर करण्यात आले आहेत.
परंतु कणकवली शहरामध्ये परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे नाव वापरुन काही लोकांकडून दिपोत्सव व रिल्स स्पर्धाचे आयोजन करणेत आल्याचे निदर्शनास आले आहे. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे सर्व कार्यक्रम यापूर्वीच जाहीर आले असून त्यात कोणत्याही स्पर्धाचा समावेश केलेला नाही.
सदर ग्रुपने परमहंस भालचंद्र महाराज संस्थानाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संस्थानचे नाव वापरुन स्पर्धाचे परस्पर आयोजन केलेले असून त्याला परमहंस भालचंद्र महाराज संस्थानची मान्यता व परवानगी घेतलेली नाही., हि गंभीर गोष्ट आहे. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे सर्व आर्थिक व्यवहार हे स्वच्छ व पारदर्शक असून अधिकृत पावतीव्दारे देणे-घेणेचे व्यवहार केले जातात. विनापावती कोणतेही व्यवहार होत नाहीत. सर्व आर्थिक व्यवहार हे व्यवस्थापक व संस्थेचे लेखनिक यांच्या मार्फतच फक्त होतात. अन्य श्रेणत्याही व्यक्तीशी केलेल्या आर्थिक व्यवहारास परमहंस भालचंद्र महाराज संस्थान जबाबदार असणार नाहीत याची सर्व भक्तगणांनी नोंद घ्यावी.
पालखी मिरवणूकिमध्ये कोणताही विशिष्ट प्रकारचा ड्रेस घालणं बंधनकार नसून सर्व भक्तगणांनी उत्स्फुर्तपणे या पालखी मिरवणूकीत सहभागी व्हावे नमो भालचंद्राय गृप हा स्वतंत्रपणे असून त्याचा परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली या संस्थानचा कोणताही पटक नाही तरी सर्व भक्तगणांनी नोंद घ्यावी असे आवाहन परमहंस नालचंद्र महाराज संस्थान कणकवली तर्फे करण्यात येत आहे.

error: Content is protected !!