…अन्यथा उपरकरांची कुंडली पत्रकार परिषद घेऊन काढणार!

ब्लॅकमेलिंग मध्ये उपरकरांची पीएचडी

जिल्ह्यातील कुठलाही राजकीय पक्ष उपरकरांना प्रवेश देत नाही

आमदार नितेश राणे यांचे परशुराम उपरकरांवर जोरदार आरोप

ब्लॅकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात कुठलाही राजकीय पक्ष ज्याला प्रवेश द्यायला तयार नाही असे परशुराम उपरकर यांनी भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण व त्यांचे सहकारी अनिकेत पटवर्धन यांच्यावर जेव्हा बेछूट आरोप करतात तेव्हा कोण आरोप करतो यावर देखील सिंधुदुर्ग ची जनता विचार करेल. ज्यांनी पूर्ण आयुष्य हे टक्केवारी व ब्लॅकमेल मध्ये काढलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयी जी व्यक्ती घाणेरडे राजकारण करू पाहतेय आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करतेय, आपले स्वतःचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतोय हे भाजपा चा कोणताही कार्यकर्ता खपवून घेणार नाही असा इशारा आमदार नितेश राणेंनी उपरकर यांना दिला. रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन व त्यांचे सहकारी यांनी जिल्ह्याच्या विकासाला दिलेले योगदान व पालकमंत्री म्हणून केलेले काम हे कुणालाही नाकारता येणार नाही. रवींद्र चव्हाण यांच्या कामाचा जर तुम्हाला कौतुक करायला जमत नसेल तर निदान असं घाणेरडा राजकारण देखील करू नका. सार्वजनिक बांधकाम विभागावर बेछूट आरोप करायचे व स्वतःचे घर चालतं का पाहायच व ते जमत नसल्याने पीडब्ल्यूडी चे अधिकारी व अनिकेत पटवर्धन, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर घाणेरडे आरोप करायचे व माझ्या चार बातम्या छापून येतात का? हे पाहायचं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मी जिवंत आहे हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न उपरकर करत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. राजकारणात ज्यांची पत शून्य आहे. मनसेमधून ज्यांना हाकलवून काढलं ठाकरे सेनेमध्ये त्यांना घ्यायला कुणी तयार नाही एकनाथ शिंदेंच्या पायावर लोटांगण घातलं तरीही यांना प्रवेश दिला नाही. अजित पवारांकडे नाक घासत गेले तरीही त्यांना प्रवेश दिला गेला नाही. व भाजपामध्ये उपरकर यांना पक्षाचे दरवाजे बंद आहेत येथे देखील त्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी प्रवेश प्रयत्न केलेला अशा व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं व जनतेने यांना किती गांभीर्याने घ्यायचं याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे यापुढे जर उगाच रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन यांच्यावर बेछूट आरोप केले गेले तर तुमच्या देखील कुंडल्या आम्हाला काढाव्या लागतील असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच वातावरण तुमचा वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी खराब करत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. जिल्ह्याच्या विकासात ज्यांचा एक टक्का देखील योगदान नाही त्यांनी रवींद्र चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करू नये. अन्यथा तुम्ही ज्याप्रमाणे पत्रकार परिषद घेत माहिती देता त्याचप्रमाणे आम्हाला देखील तुमच्या बद्दल भरपूर माहिती आहे ती पत्रकार परिषद घेत माहिती समोर आणावी लागेल. आम्ही सुद्धा आमचं तोंड उघडू शकतो. पण कुणाला किती महत्त्व द्यायचं हे चांगलं माहिती असल्यामुळे आम्हाला कुणाचं नाव घेऊन कुणाला मोठा करायचं नाही असं टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!