विकास केलात तर मतदारांना पैसे का वाटता ?

संदेश पारकर यांचा सवाल
विनायक राऊत यांचा विजय निश्चित
निलेश जोशी । कुडाळ : राणेंनी विकास केला म्हणता मग लोकांना मतांसाठी पैसे वाटायची वेळ का आली, असा सवाल शिवसेना उबाठा गटाच्या संदेश पारकर यांनी उपस्थित केला आहे. पारकर यांनी आज कुडाळ येथे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. राणे-भाजपकडून गावागावात मतदारांना पैसे वाटण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोय त्यांनी यावेळी केला. हि निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून यात विनायक राऊत यांचा विजय होईल आणि ते अडीज लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असे पारकर म्हणाले. यावेळी मंदार शिरसाट, संतोष शिरसाट उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदेश पारकर पुढे म्हणाले, संविधान वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. मोदी सरकारकडून हुकूमशाही, सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. ईडी, सीबीआय, आयटी यांची दहशत आहे. मोदींनी गेली दहा वर्ष जनतेला फक्त अच्छे दिनाची स्वप्नच दाखवली आणि अदानी – अंबानी यांना देश विकण्याचे काम काम केले. जीएसटीमुळे व्यापारी मेटाकुटीला आला आहे. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून खंडणी वसूल कर्णयचे काम मोदी सरकारने केले आहे. आमदार-खासदार सोडून पक्ष चोरण्याचं काम केले. समाजासमाजात तेढ निर्मण करण्याचे काम केले. हिंदू राष्ट्राचे स्वप्न दाखवले. देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. लोकांच्या मनात मोदी सरकारबद्दल राग आहे. पेट्रोल दरवाढ झाली आहे. कटाचे दार वाढले आहेत. सोन्याचे भाव वाढले आहेत. वाढत्या महागाईने जनता बेजार झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारला घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, असे श्री. पारकर म्हणाले.
याउलट विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघात चॅनल जनसंपर्क ठेवला. संघटनात्मक काम केले. विकासकामे केली. त्यामुळे विनायक राऊत याना मोठा जनाधार आहे. महाविकास आघाडीने महायुतीसमोर तागडे आव्हान उभे केले असल्याचे श्री. पारकर म्हणाले.
राणे भाजपकडून गावागावात मतांसाठी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप पारकर यांनी यावेळी केला. धनशक्ती विरुद्द जनशक्ती अशी हि लढत असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे तुमची विकास केला असा प्रचार करता मग मतदारांना पैसे वाटायची गरज का भासतेय असा सवाल त्यांनी उपस्थित केला ह= आहे. ठेकेदारीतून टक्केवारी घेऊन मिळालेली हि लक्ष्मी राणेंचे समर्थक लोकांना मतांसाठी वाटत आहेत. पण लोकांनी कोणत्याही प्रलोभनांना न भुलत आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन श्री. पारकर यांनी यावेळी केले.
यावेळी विनायक राऊत यांची विजयाची तर नारायण राणे यांची पराभवाची हॅट्रिक होणार आणि इंडिया आघाडी सरकारमध्ये विनायक राऊत मंत्री होणं असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नारायण राणेंचे राजकीय अधःपतन होत आहे. एकेकाळी इतरांना निवडणुकीचे तिकीट देणारे राणे आता आपल्या तिकिटासासाठी धडपड करताना पाहायला मिळाले. राणेंचे भाजपमध्ये एवढे वजन आहे तर आमदार नितेश राणे यांचा डावलून रवींद्र चव्हाण याना का मंत्री केले याचाच विचार जनतेने करावा. आता जिल्ह्यातून राणेशाही संपवण्याची वेळ आली आहे. राणेंचा हा शेवटचा प्रयत्न आहे. राणेंचा प्रभाव निश्चित आहे.
जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे, ती हि राणेंची घराणेशाही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास श्री. पारकर यांनी व्यक्त केला.
राणे म्हणजे बेईमानीची शेती एहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा मुख्यमंत्री केले. पण त्यांनी शिवसेना सोडली. काँग्रेसने त्यांना मंत्रीपदे दिली त्यांनी काँग्रेसही सोडली. स्वाभिमानी पक्षाचे विसर्जन करून भाजपमध्ये सामील झाले. जनाधार संपल्याने शेवटी राज्यसभेचे खासदार झाले याची आठवण संदेश पारकर यांनी यावेळी करून दिली. जिल्ह्याचा नाही तर राणेंचा स्वतःचा विकास झाला. राणेंची विकासाची मानसिकता असती तर त्यांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी आपल्या मंत्रालयाचा उपयोग केला असता. पण राणे अधिक काही करू शकले नाही हे वास्तव असल्याचे संदेश पारकर म्हणले. त्यामुळे यावेळी विनायक राऊत अडीज लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार असा विश्वास यांनी शेवटी व्यक्त केला.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.