राऊतांना नाही तर केसरकरांना व्हॅनिटीत आरामाची गरज !

अमित सामंत यांचा दीपक केसरकर यांना टोला
कुडाळ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी बैठक
निलेश जोशी । कुडाळ : आरामाची गरज खासदार विनायक राउतना नाही तर दीपकभाईंना जास्त आहे. म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. त्यात त्यांनी आराम करावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याना लगावला आहे. केसरकर यांनी विनायक राऊत यांनी आराम करावा असे म्हटले होते, त्यावर ते कुडाळ मध्ये बोलत होत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. त्यांनतर माध्यमांशी संवाद साधताना अमित सामंत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीला आमदार वैभव नाईक, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादीचे प्रसाद रेगे, शिवाजी घोगळे, आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळकर, भास्कर परब असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना अमित सामंत म्हणाले, दिपकभाईचे प्रत्येक निवडणुकीतले नेते वेगवेगळे असताता असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. दोन हजार सालापासून आम्ही बघतोय. कधीतरी शरद पवार त्यांचे नेते होते. त्यावेळी राणेसाहेबांच्या विरोधात त्यांनी कसे रान उठवले, ते आम्ही पाहिलेय. आम्ही त्यावेळी त्यांच्या बरोबर होतो. आता त्यांची भूमिका वेगळी आहे. जसा वारा येईल तशी पाठ फिरवणे हे त्याचे पहिले उद्दिष्ट असते. त्यामुळे व्हॅनिटीत बसून आरामाची खरी गरज दिपकभाईना आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित सामंत म्हणाले, मतदानाला आता शेवटचे आठ ते दहा दिवस शिल्लक आहेत. ही निवडणूक आता जनतेची झाली आहे. . जिथे गद्दार ऊभे आहेत तीथे त्यांच्या विरोधात खुद्दार उभे आहेत. जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. . राष्ट्रवादी एकदिलाने महाविकास आघाडीचे काम करत आहे. बैठकांना चांगला प्रतिसद मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेची निवडणूक सुद्धा डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. मोदी सरकार विरोधात लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. लोक त्यांना नक्की जागा दाखवतील. महाविकास आघाडीचे चिन्ह नवीन आहे. हे मशाल चिन्ह घराघरात पोचवले पाहिजे. कार्यकर्त्यानी विनायक राउत नाही तर शरद पवार उभे आहे अस समजून मतदान करा. त्यांच्या अपमानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे. पवार साहेबानी फुटना बघितले . पण तत्वांशी तडजोड केली नाही. हि आपल्या अस्तिवाची निवडणूक आहे.असे श्री. सामंत यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, या निवडणुकीनंतर निवडणूक होतील की नाही असा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अजून झाल्या नाहीत. एकाच व्यक्तीच्या हातात देश जातोय की काय अशी भीती आहे. 2009 पासूनच राष्ट्रवादी आम्हाला ला मदत करत होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 1 कोटी रुपयांची व्हॅनिटी जमीन विकून घेतली की खोक्यातून घेतली, असा सवाल त्यांनी केला. . या निवडणूककीनंतर अजित पवारांसोबत 5 आमदार सुद्धा राहणार नाहीत . लोकसभेच्या निकालानंतर सर्वजण शरद पवारांसोबत येणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. जिल्ह्यात वनसज्ञा कोणाच्या नेतृत्वाखाली टाकली? राणेंनी महसूलमंत्री असताना वनसज्ञा लावली. विरोधकांचा आवाज दडपला, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केली. आम्ही शासकीय वैद्यकीय महाविदयलय मंजूर करून आणला. महिला हॉस्पिटल उभारले पण हे सरकार त्यासाठी डॉक्टर्स देत नाही. कार्डियक लॅब जिल्ह्याबाहेर गेली.हे या सरस्कारचे अपयश आहे. जिल्हयातील चार चार मंत्री असून काय उपयोग? असा सवाल श्री. नाईक यांनी यावरी व्यक्त करून विनायक राऊत यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हंणले, महागाई वाढलीय. लोक मोदी सरकारला कंटाळले आहेत. म्हणून इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे.विनायक राऊत जमिनीवरचा खासदार आहेत. माणुसकी जपणारे खासदार.आहेत. संसदेत या भागातले प्रश्न मांडण्याचे काम विनायक राऊत यांनी केले आहे त्यामुळे . राऊत याना चांगला पाठींबा मिळत आहे असे श्री. पडते यांनी सांगितले.
हिर आरपारची लढाई. असून अबकी बार चारसो पार नाही तर आर की पार असे म्हटले पाहिजे. खासदार . विनायक राउताना पुन्हा संसदेत पाठवायचे आहे. त्यासाठी निवडणुकीच्या दरम्याने सजग रहाणे गरजेचे आहे.. बेसावध राहिलो तर पुन्हा निवडणूका होतील की नाही सांगता येत नाही. त्यामुळे इंडिया आघाडीच्या पाठीशी राहा.असे आवाहन प्रसाद रेगे यांनी यावेळी केले.
यावेळी आमरसेन सावंत, राजन नाईक, बाळ कानयाळकर, सावनी पाटकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्ते केले. विनायक राऊत खासदार म्हणून संसदेत जावेत यासाठी सद्गुरू बाळू मामांच्या भक्त सौ. अंकिता ठाकूर यांनी आठ दिवस अनवाणी चालण्याचे व्रत केले होते. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. ठाकूर यांनी सुप्रिया सुळे याना द्यायला सद्गुरू बाळूमामांची मूर्ती अमित सामंत यांच्याकडे सुपूर्द केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटकर यांनी केले. या बैठकीला कुडाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे सासर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.