लोकसभेसाठी मी इच्छुक, पण पक्ष देईल तोच उमेदवार!

भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी अखेर व्यक्त केली “मन की बात”

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौ-यानुसार रायगड जिल्याह्यातुन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 ऑक्टोंबरला येणार आहेत. या दौ-यात घर चलो अभियान, विधानसभा 300 कार्यकर्ता बैठक घेण्यात येणार असून त्यांचे , दोन्ही जिल्ह्यामध्ये स्वागत होईल. या दौ-याचा समारोप सावंतवाडीत भाजपा कार्यालय चे उद्घाटन करुन होईल. त्यानंतर पुढील काळात भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही दौरे होणार असल्याची माहिती भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी आमंदार प्रमोद जठार यांनी दिली. तसेच येणा-या लोकसभा निवडणूकीत खा. विनायक राऊत यांना समुद्रात डुबवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित प्रत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , भाजपा फ्रेंड सर्कल लोकसभा प्रमुख बबलू सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
19 ऑक्टोंबर ला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा लोकसभा दौरा रत्नागिरी येथून सुरु होईल. त्यानंतर रत्नागिरी येथे 10 वाजता स्वागत,घर चलो अभियान , रत्नागिरी जिल्ह्यातील 3 विधानसभा 300 कार्यकर्त्यांनी बैठक, त्यानंतर नानिज येथील नरेंद्र महाराज यांच्याकडे दर्शन व अल्पोपहार होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कणकवलीत दुपारी 3 वाजता आगमन होईल . स्थानिक आमदार नितेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे जिल्ह्यातील विस्तृत कार्यक्रम जाहीर करतील. येथे स्वागत होईल, घर चलो अभियान , 300 कार्यकर्त्यांनी बैठक , सावंतवाडी भाजपा कार्यालयात उद्घाटन करत या दौ-याचा समारोप होणार आहे. त्याच्या समवेत राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर,आ.नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी खासदार निलेश राणे आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले . मी
लोकसभा निवडणूक प्रमुख आहे,मी संघटनात्मक बांधणीचे काम करतोय, मात्र, लोकसभा उमेदवार ठरवण्याचा निर्णय वरिष्ठ भाजपा कमिटी घेत असते. मी जरी इच्छूक असलो तरी पक्षश्रेष्ठी देतील तो उमेदवार महायुतीचा निवडणून आणला जाईल. कारण , गेल्या काही वर्षात चुकीचा खासदार असल्याने केंद्राच्या योजना योग्य पद्धतीने वापरल्या नाहीत.त्याचा फटका या हायवे कामामध्ये दिसत आहे. विरोधी पक्षातील खासदार असल्याने राज्य आणि केंद्र सरकार मध्ये योग्य समन्वय नाही.या खासदारांनी कोणतीही कामे केली नाहीत. 3 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी प्रकल्प रखडवण्याचे पाप खा. विनायक राऊत यांनी केले आहे. हा ज्या खासदारांनी रोजगार ज्यांनी बुडवला,त्या खासदारांना आम्ही समुद्रात बुडवणार असल्याचा इशारा माजी आ. प्रमोद जठार यांनी दिला आहे.
4 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत. सीवर्ल्ड विरोध देखील राऊत यांनीच केला. त्याउलट त्यांनी महामार्गावर टोल वसुलीचे काम मिळवण्यासाठी आपल्या मुलाची कंपनी बनवली त्या कंपनीने रायगड मध्ये 2 टोल वसुली चे काम मिळवले असल्याचा घणाघाती आरोप प्रमोद जठार यांनी केला.
सिंधुरत्न उपसमिती आढावा बैठक झाली . या बैठकीत महिला बचतगटांना 1 कोटी कोंबडी पिल्ले देण्यात येणार आहेत. त्यातुन बचतगटाच्या महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शालेय पोषण आहारामध्ये 58 हजार मुलांना आठवड्यातून 3 दिवस समावेश अंड्याचा सामावेश करावा. अशी मागणी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाईल. दूध उत्पादन वाढ करण्यासाठी सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून योजना आणणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!