केसरकरांनी कात्रजचा घाट पाहिलाय का?

बंड करणार् यांविषय काय बोलणार महाराष्ट्राची ही संस्कृती नाही
जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते
सावंतवाडी
बंड करणार् यांविषयी काय बोलणार महाराष्ट्राची ही संस्कृती नाही अशी टिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दीपक केसरकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्ना दरम्यान केली.
पक्षाध्यक्ष शरद पवारांना कात्रजचा घाट दाखविण्याची भाषा करणार्या केसरकरांनी तो घाट बघितला का? की ते नुसत्या फुशारक्या, असा प्रतिप्रश्न विचारुन त्यांनी चक्क पत्रकारांना फुुंकून दाखविले. जिल्हा दौर्यावर असलेले आव्हाड यांचे आज सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीच्या माध्यमातून येथील जयप्रकाश चौकात माजी राज्यमंत्री प्रविण भोसले व कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या हस्ते जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी श्री. केसरकर यांनी बंड केले आहे. याबाबत काय असे विचारले असता ते म्हणाले, बंड करणार्यांना आता जात-पात राहिली नाही कोणीही, कधीही आणि कसेही आपल्या स्वार्थासाठी जात आहेत त्यामुळे त्यांच्या बद्दल न बोललेच बरे. यावेळी मंत्री मंडळ विस्ताराबाबत विचारले असता हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी चार मुख्यमंत्री करावे आणि दहा उपमुख्यमंत्री करावेत, काही झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही. जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे काम जोमाने करण्यात येणार आहे. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. गेली पंचवीस वर्षे मी त्यांना ओळखतो. तो हाडामासाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली पक्षाला नक्कीच चांगले दिवस येतील.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, जिल्हा सदस्य ऑसटन फर्नांडिस, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, बाबल्या दुभाषी, रजा खान, फैज शेख, सिद्धी निंबाळकर, ॲड. रबिया शेख, साजिदा खान, रुकसाना खान, हसीना खान, हिदायतुल्ला खान, पप्पू शेख, जावेद शेख, आशिष कदम आदी उपस्थित होते.