वंदे भारत एक्सप्रेस मधील नाश्ता, जेवण दराबाबत माजी आमदार परशुराम उपरकरांकडून आक्षेप

सिंधुदुर्ग मध्ये सावंतवाडी येथे या रेल्वेला थांबा देण्याची मागणी

नियमापेक्षा जादादाराने होते तिकीट आकारणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वंदेभारत एक्सप्रेस या मडगावपर्यंत असलेल्या गाडीतुन कणकवलीपर्यंत प्रवास केल्यावर सदर प्रवासाच्या दरम्यान ट्रेनचा दरवाजा उघडणे किंवा बंद होण्याकरीता आणि प्रवाशाचे सामान राहिले प्रवासांचे सामानाची आठवण करून देण्याकरीता आणि प्रवासांचे स्वागत करण्याकरता इतर ज्या सुचना केल्या जातात मराठी, हिंदी, इंग्रजी व गोवण (कोकणी भाषा) केल्या जातात. कोकण रेल्वे करीता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या. जिल्ह्यातील जमीन मालकांनी जमीनी दिल्यामुळे गोवा ट्रेन प्रवास करणाऱ्यांचे १५ ते १८ तास वाचले. त्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्प होऊ शकला.
असे असताना वंदे भारत या ट्रेनने सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वरील भाषेमधून सुचना ऐकताना गोव्यातील भाषेतून सुचना ऐकताना मालवणी किंवा रत्नागिरी कोकणी भाषेतून सुचना का होत नाहीत असा सवाल मनसेचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर ट्रेन ही निव्वळ गोव्याकरीता सुरू केली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. अशी काही प्रवाश्यांची चर्चा बोगीमध्ये सुरू होत होती. या ट्रेनने प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत नव्याने होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मडगाव ट्रेनमध्ये रत्नागिरी दोन थांबा सिंधुदुर्ग एक थांबा रायगड एक थांबा गोव्यामध्ये दोन थांबे दिलेले आणि या जिल्ह्यातील कोकणी, मालवणी भाषेमध्ये सुचना होण्याची मागणी करत आहोत असे पत्र श्री उपरकर यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला दिले आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली थांबा दिला आहे. त्या कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळचा काही भाग मालवण या भागात जोडला जाईल व त्या तालुक्यातील काही प्रवासी लाभ घेऊ शकतील. पण कुडाळचा काही भाग सावंतवाडी, वेंगुर्ला या ३ तालुक्यातील नागरीकांना सावंतवाडी थांबा देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील २ थांबे मिळू शकल्यास संपूर्ण जिल्ह्यातील प्रवासी प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने प्रवासी आनंद घेऊ शकतात. दोडामार्ग प्रवासी थिविम मधील थाब्याचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे सावंतवाडी थांबा देण्याकरीता श्री उपरकर यांनी आग्रही मागणी केली आहे.तसेच रेल्वेच्या पत्रकाप्रमाणे जेवण, नाश्ता, चहा प्रवासात मागणी केल्यास प्रत्येक गोष्टीसाठी व्यतिरिक्त ५० रूपये आकारले जातील असे म्हटलेले आहे. ते आकारण्यात येऊ नये. ज्याप्रमाणे कोकण कन्या व इतर रेल्वेंना जे दर आहेत ते दर आकारण्यात यावेत. कारण इंडियन रेल्वेच्या प्रति किलो मीटर दरापेक्षा तिकिटाची जास्त आकारणी कोकण रेल्वे करत आहे. त्यामुळे हा नसता अधीभार प्रवाश्यांना खाण्यासाठी लावू नये. कणकवलीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना सकाळी सहा वाजता चहा व दोन मारीची बिस्किटे व पाण्याची बॉटल दिली जाते. व सकाळी साडे आठ वाजता नाश्ता करताना आम्लेट, २ ब्रेड स्लाइज, मस्का क्यूब, एखादा फरसाण ॲटम यावर १० रूपये दर प्रिंट असतो. एखादा टेट्रा पॅकमधील थंड पेय व चहा दिला जातो. याकरीता तिकिटांमध्ये खाण्याचा पर्याय निवडला तर १५७ रूपये GST सह आकारले जातात. त्यामुळे रेल्वेमध्ये दिले जाणारे खाण्याचे दर रेल्वेच्या नियमाप्रमाणे कमी असावेत. तसेच मालवणी कोकणी भाषेबाबत सुचना प्रकाशित करावे व खाद्यपदार्थांचे दर नियमित ठेवावे. सावंतवाडी थांबा मिळण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी श्री उपरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!