कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय!

आकारीपड प्रश्न अखेर सुटला

शासनाकडून जीआर जारी

निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश


कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे विभागातील 28 गावांमधील हजारो हेक्टर आकारीपड जमिनीचा ताबा अनेक वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता, ती जमीन आता पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जारी केलेल्या नवीन जीआरनुसार बाजारमूल्याच्या ५% रक्कम शासनास जमा केल्यास जमीन शेतकऱ्यांना परत दिली जाणार. जमिनीचा वापर शेती / कृषी उद्देशासाठीच करावा लागेल. ५ वर्षांपर्यंत जमिनीचा वापर बदलता किंवा विक्री करता येणार नाही. हा निर्णय कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. तसेच शेतकऱ्यांच्या त्यांच्या कष्टाचं, संघर्षाचं फळ आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत. कुडाळ – मालवण मतदारसंघाचे
आमदार निलेश नारायण राणे यांनी निवडून आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करत होते. अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्ग लावण्यत निलेश राणे यांना यश आले आहे.

error: Content is protected !!