पहिल्याच पावसात महावितरण कणकवली मध्ये नापास!

कलमठ मध्ये वीज समस्यांनी ग्रामस्थ हैराण, सरपंचांसह ग्रामस्थांची वीज वितरण वर धडक
आठ दिवसात कामे मार्गी लावण्याचे उपकार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन
कलमठ मधील विविध विज समस्यांबाबत आक्रमक झालेल्या सरपंच संदीप मेस्त्री यांच्या सहित ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. कनिष्ठ अभियंता श्री. बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी आठवडाभरात प्रलंबित कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
कलमठ गावातील विविध समस्यांबाबत संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांच्यासोबत चर्चा करताना सर्वप्रथम कलमठ विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री बोंगाळे बोलावून घेण्याची मागणी करण्यात आली.
श्री बोंगाळे येताच ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज समस्यांबाबत फोन लावला तरीही ते फोन उचलत नाहीत ग्रामस्थांना योग्य उत्तर येत नाहीत याबाबत आक्रमक ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. श्री बोंगाळे ग्रामस्थांमध्ये शाब्दिक वादळी झाला यावेळी श्री बगडे यांनी कनिष्ठ अभियंत्यांना फोन उचलण्यासहित नागरिकांची सौजन्य पूर्ण वागण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी श्री बोंगाळे त्यांनी यापुढे आपणाला जी कामे सांगितली जातील ती लेखी देण्यात यावी तोंडी कामे आपण करणार नाही असे सांगताच आक्रमक ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. वीज समस्यांबाबत व आपत्कालीन स्थितीत आम्ही आपणाला फोन करतो त्यावेळी आपण फोन न उचलल्यामुळे आम्हालाही कार्यकर्ते ग्रामस्थांना उत्तरे देता येत नाहीत. योग्य माहिती वेळीच मिळाली तर सहकार्य ही करता येते असे ग्रामस्थ म्हणाले.
यावेळी महावितरणच्या वायरमननाही बोलावण्यात आले. त्यांनीही श्री बोंगाळे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अधिकाऱ्यांसमोरच स्पष्ट भूमिका मांडली. दरम्यान श्री बगडे यांनी कलमठ मधील वीज समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने आपण कार्यवाही करतो असे आश्वासन दिले. त्यानुसार प्रलंबित कामांची यादी तयार करण्यात आली यात श्री बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीमुळे कामावर हजर न होणाऱ्या रामू सांगवेकर यांना तातडीने हजर करून घेणे, विठ्ठल मंदिराकडील सहा महिन्यांपासून काढावयाचा शिल्लक असलेला तातडीने काढणे, खालची कुंभारवाडी बॉक्सपेटी बदलणे, दळवी कॉलनी बॉक्स पेटी बदलणे, बिरमोळे हॉस्पिटल समोरील ट्रान्सफॉर्मरची बुशिंग बदलणे, दत्तनगर थ्री फेज लाईन करणे, लांजेवाडी ट्रान्सफॉर्मर बदलणे व थ्री फेज करणे बाजारपेठ बॉक्स पेटी बदलणे, बीडएवाडी ट्रान्सफॉर्मर पोलला स्टे देणे, मुस्लिम वाडी बोलला शिफ्टिंग करणे आदि कामे प्राधान्याने आठ दिवसात करण्यात येतील असे आश्वासन यावेळी श्री बगडे यांनी दिली.
यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, महेश लाड, निसार शेख, नितीन पवार, अनुप वारंग, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, दिनेश गोठणकर, गुरु वर्देकर, बाबू नारकर, अमजद शेख, तेजस लोकरे, प्रकाश सावंत, प्रणय शिर्के, एके तावडे, स्वरूप कोरगावकर उपस्थित होते.
कलमठ गाव अर्बनला जोडा, कनिष्ठ अभियंता बोंगळे अकार्यक्षम. अनेक वर्षे तेच प्रश्न एकदाच कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी ग्राम वारंवार होत आहे, 3 दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित होत राहणे म्हणजे महावितरण पाहिल्याच पावसात नापास झाल्यासारखे आहे, कलमठ वीज प्रश्नी कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना भेटणार.
कणकवली प्रतिनिधी