खारेपटण – भुईबावडा – गगनबावडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…..

सामाजिक कार्यकर्ते सुनील नारकर यांनी सा.बा. अधिकाऱ्याच्या निदर्शनास दिले आणून

आंदोलनाचा दिला ईशारा …

खारेपटण – भुईबावडा – गगनबावडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.सदरचे काम निलंबित केलेल्या ठेकेदाराकडून करून घेतलं जात आहे या मागचं नेमकं कारण काय? अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये साठे – लोट आहे का यास अनेक प्रश्न उपस्थित करून भुईबावडा येथील समाजसेवक सुनील नारकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून दर्जेदार काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
खारेपटण भुईबावडा गगनबावडा रस्त्याचे खड्डे भरणे आणि मजबुतीकरणाचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे सदरचे काम हे दर्जेदार होत नसल्याने येथील नागरिकांनी याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केली होती तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील नारकर यांनी देखील या कामावर सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती परंतु त्याची दखल घेतली गेली नाही तसेच काम चालू असताना संबंधित विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचेही निदर्शनात आले आहे नारकर यांनी याबाबत सिंधु रिपोर्टरशी बोलताना सांगितले की सध्या उंबर्डे वाणीवाडी येथे काम सुरू आहे, निकृष्ट दर्जाच्या कामा मुळे सोमवारी एका मोटार सायकल चा अपघात झाला. सुदैवाने किरकोळ जखमी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रस्ताच्या कामावर लाखो रुपयांचं चुना लावण्याचे काम ठेकेदार करीत आहेत त्यामुळे दरवर्षीच रस्ता वाहतुकीची नादुरुस्त होतो ही बाब सबंधित अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली असतांना ही दुर्लक्ष केले जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम चे अधिकारीच आहेत दर्जेदार काम केल्यास रस्ता वाहतुकीस चांगला होईलच त्याशिवाय किमान पाच वर्ष तरी रस्त्याचे डागलूजी (दुरुस्ती ) करण्याची गरज नाही म्हणजेच लाखो रुपयाचा चुना ठेकेदार या कामाच्या माध्यमातून लावीत असतानाही अधिकारी गप्प का??असा सवाल सुनील नारकर यांनी उपस्थित करून निकृष्ट दर्जाचे झालेले काम पुन्हा सुधारित दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे जर दर्जेदार काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नारकर यांनी दिला आहे. तसेच आपण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी मंगळवारी भेट घेऊन या दर्जाहीन कामा बाबत आणि अधिकारी दुर्लक्ष पणा बाबत निदर्शनास आणून देणार असल्याचेही स्पष्ट केले.
काम करीत असलेला ठेकेदाराचे लायसन्स आहे का ? कारण मिळालेल्या माहितीनुसार चिंतामणी नामक ठेकेदार दाराकडून हे काम करून घेतले जात आहे संबंधित ठेकेदाराचे लायसन (बांधकाम परवाना) रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे असे असतानाही अशा ठेकेदाराला काम देण्यामागचे कारण काय ?असा प्रश्न नारकर यांनी उपस्थित केला आहे.

वैभववाडी / किशोर जैतापकर / कोकण नाऊ

error: Content is protected !!