बंगाल मध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात कारवाईसाठी राष्ट्रपतींना देण्यासाठी बजरंग दलाचे निवेदन

मुर्शिदाबाद येथील अत्याचार रोखा, हिंदुना संरक्षण द्या अशी केली मागणी
कणकवलीत तहसीलदारांना दिले निवेदन
बंगालमध्ये मुर्शिदाबाद या ठिकाणी हिंदूंवर सुरू झालेले अत्याचार हे आता संपूर्ण बंगालमध्ये पसरत आहेत. बंगाल शासनाकडून याबाबत कठोर उपाययोजना करण्याची गरज असताना तशा उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. वक्फ बोर्डाचे बिल पास झाल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन ही निमित्तापुरते असून या आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंवर अपरिमित अत्याचार सुरू करण्यात आले. या अत्याचारामध्ये हिंदूंची घरे जाळण्यात आली. हिंदूंना मारण्यात आले. यामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले. तर महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अनेक गावांमधील ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावं लागलं. एवढी दहशत या ठिकाणी हिंदूंवर सुरू आहे. त्यामुळे हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात बजरंग दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रपतींना देण्यासाठी निवेदन देण्यात आले. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या मागणीनुसार बंगालमध्ये असलेले सरकार हे मुस्लिम धार्जीने असून या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रपतीनी तात्काळ दखल घेत बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. बंगालमध्ये हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असून कायदा सुव्यवस्था पूर्णतः नष्ट झाली आहे. बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची nia वतीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी देखील मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बंगालमध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशी रोहिग्याना तिथून हाकलवून लावून बंगाल व बांगलादेशच्या सीमेवर 450 किलोमीटर अंतरात रक्षक तार लावून घुसखोरी रोखण्याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग बजरंग दल विभाग प्रमुख दत्तप्रसाद ठाकूर कणकवली तालुकाप्रमुख बजरंग दल नागेश मोगवीरा, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाप्रमुख सुनील सावंत, श्रीरंग राणे, विनय सावंत, अमित मयेकर आदी उपस्थित होते.