उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस शब्दात माजी आमदार प्रमोद जठारांकडून समाचार!

ज्यांना बजेट मधलं कळत नाही ते मुख्यमंत्री व पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहेत
माजी आमदार प्रमोद जठार यांची घणाघाती टीका
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे थोर पुरुष ही कोणाची वैयक्तिक मालकी नाही. ते जनेच्या हृदयातील मालकी आहे. वारसा हक्काने संत्ती येते विचार, देशभक्ती वारसा हक्काने येत नाही. देशभक्तीचे,विचारांचे खरे वारसदार नारायण राणे,राज ठाकरे,एकनाथ शिंदे आहेत.नेतृत्व,दातुत्वा,वक्तृत्व हे वारसा हक्काने येत नाही ते कमवावे लागते. अशी घणाघाती टीका भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रचार प्रमुख,माजी आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
हिंदुस्थानची शकले व्हावीत अशी इच्छा ज्या परदेशी यंत्रणेची आहे. अशा लोकांनी उध्दव ठाकरे यांच्या कोपराला गुळ लावून राज्याचे मुख्यमंत्री,देशाचे पंतप्रधान करण्याची स्वप्ने दाखवली आहे. देशाचे दुश्मन असणाऱ्या मंडळींचे व्हायरल इन्फेक्शन भाजप विरोधी पक्षांना झाले आहे.कोकणच्या विकासाचा अजेंडा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या रूपाने पूर्णत्वास येईल. महायुतीचे उमेदवार नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वासही प्रमुख जठार यांनी व्यक्त केला.
उध्दव ठाकरे यांनी बजेट स्वतःला कळतं नाही हे जाहीर सांगितले आहे. तुमची इयत्ता कोणती. कोणताही प्रश्न ते गांभीर्याने घेत नाही. बहुमत सिद्ध होण्यापूर्वी राजीनामा दिला.आडिज वर्षात अडीच दिवस सुद्धा प्रशासन समजून घेतले नाही.त्यांना पुन्हा मुख्यमंत्री ,पंतप्रधान व्हायची स्वप्ने पडत आहेत त्यांना जनता गांभीर्याने घेत नाही.
उध्दव ठाकरे यांच्या धनदांडग्या नातेवाईकांनी नानार परिसरातील जागा घेतल्या.हे विनायक राऊत ने जाहीर सभेत बोलले. त्यांनी उदाहरणे देवून कबुली दिली.
प्रमोद जठार,पुढे म्हणाले,अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मात्र अडीच दिवस सुद्धा ते मंत्रालयात गेलेले नाहीत.प्रकल्प गुजरातला नेता म्हणून आणि रोजगार नाही म्हणून आरडा ओरडा करता.त्या प्रकल्पांसाठी तुम्ही काय केले ते सांगा.जामनगर च्या सावकारी रिफायनरी मुळ त्या ठिकाणी श्रीमंती आली.
त्याच रिफायनरी मुळ अंबानी श्रीमंत झाले.त्याच्या कार्यक्रमाला तुम्ही गुजरात मध्ये गेला होता.मात्र त्यांचे खाऊन आला आणि इथे मात्र दोन लाख पोरांचा रोजगार तुम्ही बुडविला.
जे राऊत या प्रकल्पाला विरोध करतात त्यांचा विरोध सोडला तर तुमच्या समवेत असलेल्या एकाचाही विरोध नाही.
सीएसआर मधून विनायक राऊत ला दोन शौचालय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले नाहीत ही या खासदाराची लायकी आणि म्हणून विनायक राऊत प्रकल्पांना विरोध करतात. अशी टीका प्रमोद जठार यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मेडिकल कॉलेज हे मोदी सरकारची देणं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे असताना मंजूर झाले.मोदींनी प्रत्येक जिल्हात असे कॉलेज मंजूर केले.
आडाळी संशोधन क्रेद्राची जागा मी मिळवून घेतली. आनंद वाडी प्रकल्पाला ६५ कोटी मी आणले.महामार्ग चौपदरीकरणाचे काम आम्ही मंजूर केले पूर्ण केले आणि विनायक राऊत ने मुलांच्या नावावर टोल ची कंपनी घेतली.
विनायक राऊत,उध्दव ठाकरे ही राजकारणातील विकृती आहे. चीपिला आधी विरोध केला उद्घाटनाच्या वेळी मात्र हिरवा झेंडा घेऊन आले. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही यांची ख्याती आहे त्यामुळे जनतेने आता आपण कोणासोबत जाणार याचा विचार करावा महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रगतीच्या दिशेने जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि ठाकरे राऊत हे अधोगतीच्या दिशेने जाणारी व्यक्तिमत्व आहे. अशी ठिकाणी यावेळी प्रमुख जठार यांनी केली.
कणकवली प्रतिनिधी