कलमठ सरपंचांच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर महावितरण कडून तात्काळ कामे मार्गी

वीज अधिकाऱ्यांनी घेतल्या कलमठ ग्रामपंचायतमध्ये बैठका
चार वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आठ दिवसात लागले मार्ग
कलमठ गावातील वीज समस्या प्रश्नी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडुन या उपोषणाची तात्काळ दखल घेत कलमठ ग्रामपंचायत मध्ये महावितरणचे अधिकारी दाखल होत दोन बैठका घेऊन यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. व उर्वरित प्रश्न येथे आठ दिवसात सोडवण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली. जवळपास ३ AB स्विच, २ ट्रान्सफॉर्मर, २५ वीज खांब, अवघ्या ८ दिवसात काम पूर्ण करण्यात आली.
कलेश्वर नगर, गावडेवाडी,महाजनी नगर,गुरव वाडी,बॅक कॉलोनी साठी मनोहर शिल्प नजिक रिंग फिडींग काम सुरू झाले असून या परिसरात कणकवली शहर मधून पर्यायी वीज पुरवठा करण्यासाठी उपयोग होणार आहे. उर्वरीत कलमठ गावासाठी स्वतंत्र लाईन साठी नवीन अंदाजपत्रक २ दिवसात केले जाईल असे श्रीराम राणे यांनी सांगितले असता त्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल असा शब्द सरपंच संदिप मेस्त्री यांनी दिला. गावडेवाडी सोमवारी २०० केव्ही तर बिडियेवाडी साठी नवीन ट्रांसफार्मर बसवून झाला आहे. ११केव्हि लाईन कलमठ मधून आचरा रोड वरील वरवडे,पिसेकामते तर महामार्गावरून जाणवली , हुमरट,साकेडी व इतर गावांपर्यंत वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे कुठल्याही गावात बिघाड झाला तर कलमठ गावात वीज पुरवठा खंडित होतो. त्यासाठी महावितरणच्या अधकाऱ्यांना लक्षात आणून दिल्या. नंतर कलमठ गावाच्या सीमेवर लांजेवाडी, कुंभारवाडी व गावडेवाडी साठी AB स्विच मंजूर करून बसवण्याचे काम सुरू झाले असून, भविष्यात इतर गावात कोणताही लाईन बिघाड अथवा पावसाळी आपत्ती मध्ये ab स्विच मुळे कलमठ गावात वीज पुरवठा सुरू राहण्यास मदत होणार आहे. या व्यतिरिक्त गावातील थ्रीफेज लाईन काम पूर्ण झाले असून नवीन वीज खांब साठी मागणी केलेले बिडीये वाडी दत्त नगर, गणेश मंदिर व स्वराज्य नगर,मनोरमा पार्क साठी नव्या स्ट्रीट लाईनचे काम सुरू असून ४ दिवसात पूर्ण होईल,शांतादुर्गा नगर, नाडकर्णी नगर वीज खांब काम पूर्ण झाले व सुतारवाडी, गुरव वाडी, टेंबवाडी, सिध्दार्थ कॉलोनी ही सर्व कामे ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले. गणेशोत्सव काळात रात्रीचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाईल असे सांगीतले. यासाठी उपकार्यकारी अभियंता श्री अत्तार, श्री बगडे, श्री प्रकल्प येडगुळकर , श्रीराम राणे अधिकाऱ्यांनी कलमठ ग्रामपंचायत मध्ये दिनांक २९ व ३१ रोजी बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावल्या असून उर्वरीत कामे ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी चर्चे दरम्यान माजी प. स सदस्य महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चींदरकर, सदस्य दिनेश गोठनकर, नितीन पवार, आबा कोरगावरकर, बाबू नारकर,मिलिंद चिंदरकर,नाना गोठनकर उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली