संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या  दोन  विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड”  कंपनीमध्ये निवड जयसिंगपूर:(प्रतिनिधी)  शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील  इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’ …

Read More

*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*
देवगड/चाफेड (प्रतिनिधी)
           देवगड तालुक्यात चाफेड येथील दुण्डागडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले.
          सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक गडकिल्ले आहेत जे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत. अशातीलच एक गड म्हणजे दुण्डागड. या दुण्डागडावर चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत फेब्रुवारीपासून संवर्धन मोहिमांतर्गत गडावरील वास्तूंची स्वच्छता व संवर्धन करण्यात आले. दुण्डागडावर भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींच्या सोयीसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शकफलक तसेच महत्वाच्या ठिकाणासाठी नामफलक आवश्यक होते. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थमार्फत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले.
          या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, महेश परब, साईल पांचाळ, संतोष साळसकर, आकाश राणे, प्रदिप घाडी हे ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.
          साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फालकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी सौजन्य केले. अल्पोपहार व भोजनाची सोय हेमालता जाधव यांनी केली सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Read More*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*
देवगड/चाफेड (प्रतिनिधी)
           देवगड तालुक्यात चाफेड येथील दुण्डागडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले.
          सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक गडकिल्ले आहेत जे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत. अशातीलच एक गड म्हणजे दुण्डागड. या दुण्डागडावर चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत फेब्रुवारीपासून संवर्धन मोहिमांतर्गत गडावरील वास्तूंची स्वच्छता व संवर्धन करण्यात आले. दुण्डागडावर भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींच्या सोयीसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शकफलक तसेच महत्वाच्या ठिकाणासाठी नामफलक आवश्यक होते. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थमार्फत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले.
          या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, महेश परब, साईल पांचाळ, संतोष साळसकर, आकाश राणे, प्रदिप घाडी हे ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.
          साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फालकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी सौजन्य केले. अल्पोपहार व भोजनाची सोय हेमालता जाधव यांनी केली सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*
                विजय चौकेकर
कणकवली( वार्ताहर .)
       तथागत गौतम बुद्धांना मानवजातीला  बुद्धीवादी बनवायचे होते . माणूस बुद्धीवादी म्हणजेच विज्ञानवादी बनल्यास तो स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यास सिद्ध होईल . आणि  समाजात ज्या भ्रामक समजूती आहेत त्याचे उगमस्थानच नष्ट करेल . म्हणूनच बुद्धाचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवाद जीवनात आचरला तरच माणूस सुखी होईल . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा पियाळी यांनी पियाळी बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या *अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा* आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .
     यावेळी त्यांच्या सोबत विचार मंचावर पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम , पियाळी बौद्ध विकास मंडळाचे सचिव तेजराम कदम , प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा मनाली कदम , सचिव चिंती कदम , ग्रामिण पियाळी बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख गौतम तांबे ‘ सचिव अंकुश कदम , सुधांश तांबे , राहुल कदम आदी उपस्थित होते .

     विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची उपस्थितांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती करून दिली . जादूटोणा विरोधी कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते .  असे सांगितले .
पियाळी बौद्ध विकास मंडळ गावशाखेचे  अध्यक्ष गौतम तोबे सर यांनी  विजय चौकेकर यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक विद्यार्थांना सुसंस्कारित केले तर आता सेवानिवृत्तीचा काळही समाज प्रबोधनासाठी खर्च करीत असून शाळा , विद्यालय , महाविद्यालय आणि गावोगावी जाऊन  अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानमालेतून वैज्ञानिक पिढी आणि समाज घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळ श्रीफळ देऊन गौरवित  असल्याचे सांगून  त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम तांबे  सरांनी केले तर आभार  तेजराज कदम यांनी मानले
.

Read More*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*
                विजय चौकेकर
कणकवली( वार्ताहर .)
       तथागत गौतम बुद्धांना मानवजातीला  बुद्धीवादी बनवायचे होते . माणूस बुद्धीवादी म्हणजेच विज्ञानवादी बनल्यास तो स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यास सिद्ध होईल . आणि  समाजात ज्या भ्रामक समजूती आहेत त्याचे उगमस्थानच नष्ट करेल . म्हणूनच बुद्धाचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवाद जीवनात आचरला तरच माणूस सुखी होईल . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा पियाळी यांनी पियाळी बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या *अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा* आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .
     यावेळी त्यांच्या सोबत विचार मंचावर पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम , पियाळी बौद्ध विकास मंडळाचे सचिव तेजराम कदम , प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा मनाली कदम , सचिव चिंती कदम , ग्रामिण पियाळी बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख गौतम तांबे ‘ सचिव अंकुश कदम , सुधांश तांबे , राहुल कदम आदी उपस्थित होते .

     विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची उपस्थितांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती करून दिली . जादूटोणा विरोधी कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते .  असे सांगितले .
पियाळी बौद्ध विकास मंडळ गावशाखेचे  अध्यक्ष गौतम तोबे सर यांनी  विजय चौकेकर यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक विद्यार्थांना सुसंस्कारित केले तर आता सेवानिवृत्तीचा काळही समाज प्रबोधनासाठी खर्च करीत असून शाळा , विद्यालय , महाविद्यालय आणि गावोगावी जाऊन  अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानमालेतून वैज्ञानिक पिढी आणि समाज घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळ श्रीफळ देऊन गौरवित  असल्याचे सांगून  त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम तांबे  सरांनी केले तर आभार  तेजराज कदम यांनी मानले
.

जानवलीत धडक देऊन पळालेली अपघातग्रस्त कार अखेर कणकवली पोलिसांच्या ताब्यात

या कारच्या धडकेत अनिल कदम यांचा झाला होता मृत्यू कणकवली पोलीसांचे पथक होते या कार चालकाच्या मागावर पुणे निगडी येथून कार चालका सह कार ताब्यात जानवली मध्ये महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर कणकवली पोलिसांनी पुणे…

Read Moreजानवलीत धडक देऊन पळालेली अपघातग्रस्त कार अखेर कणकवली पोलिसांच्या ताब्यात

तर पुन्हा अजित दादांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? – उमेश पाटील* मुंबई (प्रतिनिधी) – अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी…

Read More

शेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद लाठया काठयांनी केली होती जबर मारहाण लोकसभा निवडणुक तील राजकीय पूर्व वैमनस्यातून वेर्ले वरचीवाडी येथील माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना बेकायदा जमावाने मारहाण करून त्यांच्याकडील ३५००…

Read Moreशेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

चक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

सलग दुसऱ्या दिवशी पंचनामे करण्याचे काम सुरूच अपवाद वगळता कृषी विभाग मात्र सुशेगात कणकवली विभागात महावितरण चे 120 पोल व तारा तुटून तीस लाखाहून अधिक नुकसान कणकवली तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला आहे. अजून दोन दिवस या…

Read Moreचक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

कणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी योग्य मदत न मिळाल्यास शिवसेना आंदोलन करणार दिगंबर वालावलकर कणकवली

Read Moreकणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!

हरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक…

Read Moreहरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

साकेडीत घरावर झाड पडून नुकसान

पंचयादी करण्याची करण्यात आलीय मागणी आज गुरुवारी दुपारी झालेल्या सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझड झाल्याची घटना घडल्या आहेत. यामध्ये दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास साकेडी फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांच्या घराच्या मागील पडवी व गोठ्यावर चिंचेच्या झाडाची…

Read Moreसाकेडीत घरावर झाड पडून नुकसान

महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार वैभव नाईक मैदानात

संजय पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आमदार वैभव नाईक यांनी केले आवाहन उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ भांडुप येथे भव्य प्रचार रॅली व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे…

Read Moreमहायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार वैभव नाईक मैदानात

कणकवलीत संजीवनी हॉस्पिटल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर

विविध शिबिरांचा लाभ घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन कणकवली मध्ये सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, संजीवनी हॉस्पिटल, कणकवली, व अथायु मल्टि-स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर आयोजित मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, गुडघे लिगामेंट, कॅन्सर विकार, किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन…

Read Moreकणकवलीत संजीवनी हॉस्पिटल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर
error: Content is protected !!