चिंदर केंद्र शाळा मुलांविनाकामगिरीवर पाठवलेला शिक्षक परत शाळेला मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार पालकांचा निर्धार

जिपकेंद्र शाळा चिंदर या इयत्ता सातवी पर्यंत च्या शाळेच्या कार्यरत तीन शिक्षकांपैकी कामगिरी वर पाठवलेला शिक्षक जोपर्यंत पुन्हा शाळेत कार्यरत होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. त्यामुळे शनिवार पासूनच चिंदर केंद्र शाळा मुलांविना सुरु आहे.
इयत्ता सातवी पर्यंत एकवीस पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंदर ला मंजूर शिक्षक संख्या चार आहे. मात्र सध्या या शाळेत केवळ मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक मिळून तीनच शिक्षक सातवी पर्यंत ची शाळा चालवत आहेत. यातच मागिल आठवड्यात एक शिक्षक दुसरया शाळेवर कामगिरीसाठी काढल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत बोलताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित दत्तदास यांनी सांगितले की कोणतीही पुर्व कल्पना न देता या शाळेच्या शिक्षकाला दुसरया शाळेत कामगिरी वर काढल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षी ही एक शिक्षक कामगिरी वर काढण्यात आला होता. त्यावेळी आम्ही सहन केले .दरवेळीच आमच्या मुलांवर अन्याय का? त्यामुळे शिक्षक परत शाळेत कार्यरत होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आचरा / अर्जुन बापर्डेकर