मालवण आगाराला तारकर्ली आणि देवबाग करिता स्वतंत्र चार मिनी बसची मागणी

मालवण आगाराला शासनाकडून चार मिनी बस एस .टी .द्यावेत जेणे करून मालवण बाजारपेठ मार्गे तारकर्ली बंदर विठठल मंदिर आणि देवबाग मिनी एस.टी ची व्यवस्था होईल अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई चे सचिव श्री. सुरेश बापर्डेकर यांनी महारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री मां.एकनाथजी शिंदे यांच्याजवळ निवेदन देऊन केली आहे.
प्रसिध्दी पत्रकात पुढे श्री. बापर्डेकर म्हणाले की मालवण तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन दृष्टया विकसित तारकर्ली गावी पर्यटन असल्याने गावात गाड्यांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ नेहमीच चालू असते अशावेळी वाहतुकीची तारकर्लीला भरपूर वेळा कोंडी होत असल्याने मोठी बस पूर्ण देवबाग पर्यंत पोहोचत नाही मध्येच तारकर्ली येथे वळून वापस घेऊन जावे लागते अशा गावातील प्रवाशी नागरिक तसेच गावातील विद्यार्थी शाळा आणि कॉलेज इतर कोर्सेस याकरिता प्रवाशी आणि नागरिक मालवणला इतर गावांनी ये – जा करीत असतात. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक पासून गावातील सर्वांना होणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागले.अशावेळी मिनी बस उपलब्ध होताच इतर फेऱ्या व्यतिरिक्त मुलांच्या सोईकरिता मालवण आगारातून सकाळी व सायंकाळी चार फेऱ्या मुलांच्या वेळेनुसार बाजारपेठ मार्गे सोडून सर्वांची होणारी गैरसोय दूर होईल.
मालवण आगारातुन ये जा फे-या काही तारकर्ली व देवबाग आहेत. परंतु त्या अपु-या आहेत. आणखी अशातच आपनाकडून चार मिनी बस मिळाल्या तर या तारकर्लीच्या आजुबाजुच्या गावातील भूतनाथ, देवली, दत्तमंदिर, वायरी, काळेथर, तारकर्ली आणि विठ्ठल मंदिर देवबाग पर्यतच्या प्रवाशी व शाळेतील मुलांना सकाळी गावातुन मालवणला शाळेत जाते वेळी आणि मालवणहून गावाकडे जर एस. टी च्या फेऱ्या पूर्वी प्रमाणे देवबाग आणि तारकर्ली येथून मालवण आणि मालवणहून तारकर्ली व देवबाग अशा मिनी बसेस सोडल्या तर नक्कीच जाता-येता सर्वांना ताटकळत उन्हा पाऊस झेलत रहायला नको. या फेऱ्या बाजारपेठ मार्गे ये-जा करत असतील तर प्रवाशाबरोबर, शाळा कॉलेज करिता ये-जा करणा-यांना या फे-यामुळे शाळा कॉलेजातील मुले आणि प्रवाशी यांना मोठया प्रमाणात फायदा होईल. आणि एस टी महामंडळाला उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर कित्येकवेळा देववागहून येणा-या एस.टी फे या भरलेल्या असल्याने या मधील गावातील बस जाग्यावर भरुन येत असल्याने येथील गावांनी बस थाबवली जात नसल्यानेशाळा कॉलेजच्या मुलाना जाण्याकरिता उशीर होतो अगर नाहक शाळा कॉलेजचा खाडा होऊनत्यांचे नुकसान होते..याकडेही निवेदनात. लक्ष वेधण्यात आले. आहे