कुडाळ शहरातील सिद्धिविनायक बिल्डिंग मधील रहिवासी पाणी टंचाईने त्रस्त.

कुडाळ नगरपालिकेचे प्रश्नांकडे दुर्लक्ष,त्रस्त नागरिक मोर्चा काढणार.

कोकण नाऊ
कुडाळ (प्रतींनिधी) कुडाळ सिद्धिविनायक बिल्डिंग मधील रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे कुडाळ नगरपंचायती पासून हाकेच्या अंतरावर असूनही कुडाळ नगरपंचायतीने मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.
कुडाळ सिद्धी विनायक बिल्डींग मध्ये सुमारे 60 ते 70 प्लॅटधारक आहेत या सर्व फ्लॅट धारकांना सध्या पाणीटंचाईला सामोर जावं लागत आहे.या इमारतीच्या आवारात तीन विहिरी असून तीनही विहिरी कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजता पंधरा मिनिटे आणि संध्याकाळी सात वाजता पंधरा मिनिटं एवढं तुरळ पाणी पुरविले जात आहे. या सदनिकेमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे रहिवासी राहतात. यातील अनेक रहिवासी हे शासकीय कर्मचारी तसेच व्यावसायिक आहेत. मात्र त्यांना पाणी पुरवठा नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत. याबाबत येतील रहिवाशांनी कुडाळ नगरपंचायतीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नुकतीच कुडाळ नगरपंचायतीची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत कुडाळ शहरात कुठलीही आणि टंचाई नसल्याचा दावा नगरपंचायत प्रशासनाने केला आहे. मात्र कुडाळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या इमारतीला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने टॅंकरने पाणीपुरवठा न केल्यास नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल अशा पद्धतीचा इशाराही या सदनिकेतील रहिवाशांनी दिला आहे.

error: Content is protected !!