मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी

शिवसेना-भाजप यांच्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हे
ठाणे : कल्याण डोंबिवली:महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ पाहायला मिळाली आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अस्तित्वात आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारला वर्ष पूर्ती होत असताना दरार निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवसेना-भाजप यांच्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.ते अनेक मुद्द्यांवर नाराज असल्याचे सांगितले जाते.गुरुवारी (08 जून) डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात शिवसेनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे श्रीकांत शिंदे व्यथित झाले आहेत.आणी ह्या बहिष्कार टाकण्याच्या बैठकीत डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते.त्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर श्रीकांत शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.श्रीकांत शिंदेच्या खासदारकीला रविंद्र चव्हाण ब्रेक लावण्याच्या तयारीत आहेत का?ही जागा भाजपला घेण्याचा रविंद्र चव्हाण यांचा डोळा आहे का?असा प्रश्न निर्माण होत आहे.रविंद्र चव्हाण सध्या शिवसेना भाजप युतीतील मिठाचा खडा असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप नंदू जोशी व अनेक कार्यकर्त्यांनी केला.दुसरीकडे, बुधवारी डोंबिवलीत येथील स्थानिक आमदार आणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.त्यात शिवसेनेला या लोकसभा मतदारसंघात मदत न करण्याचा निर्णय घेण्यात आला.आणी तसा ठराव सुद्धा घेण्यात आला.विशेष म्हणजे या बैठकीला रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते.याशिवाय दुसरे कारण असेही सांगितले जात आहे की, भाजपने गुरुवारी लोकसभा निवडणुकीतील 48 जागांसाठी प्रभारींच्या नावांची घोषणा केली आहे.निवडणूक प्रमुखांच्या घोषणेवर चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रातील भाजपने गुरुवारी (08 जून) राज्यातील लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली जाईल.शिवसेना ज्या जागांवर निवडणूक लढवेल, त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रमुख काम करतील, असेही ते म्हणाले की केंद्रीय मंत्री अमित शहा 10 जून रोजी मध्य महाराष्ट्रातील नांदेड येथे सभेला संबोधित करतील आणि पक्ष राज्यात मोदींच्या रॅलीचे नियोजन करत आहे.पण अस असताना रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहून श्रीकांत शिंदे विरोधात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देतात.यामुळे रविंद्र चव्हाण आणी श्रीकांत शिंदे यांच्यात सुरू झालेला हा वादाचा खडा युतीतील दरार ठरू शकतो.