छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य केंद्राचा शुभारंभ

सर्व सोईसुविधांसह उच्च दर्जाचे आरोग्य केंद्र उभारणार
जिल्ह्यातील डॉक्टरांच्या मदतीने उच्च दर्जाचे आरोग्य केंद्र विकसित करणार- ब्रिगे.सुधीर सावंत, माजी खासदार
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट), मुंबई संचालित छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य केंद्राचा शुभारंभ मंगळवारी जिजामाता प्रक्षेत्र ओरोस येथे झाला. माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.राजेंद्र पाताडे, अध्यक्ष डॉक्टर्स फ्रॅटर्निंटी क्लब यांच्या हस्ते केंद्राच्या कोणशीलाचे अनावरण व डॉ. विद्याधर तायशेटे, माजी अध्यक्ष फ्रॅटर्निंटी क्लब यांचे हस्ते फित कापून आरोग्य केंद्राचा शुभारंभ झाला.कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली व शुभेच्छा दिल्या. तसेच सरकारच्या माध्यमातून आरोग्य केंद्रासाठी मदत करणार असे आश्वासन दिले. ब्रिगे. सुधीर सावंत यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांच्या मदतीने हे आरोग्य केंद्र अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणार. आयुर्वेद, होमिओपॅथी, अँलोपॅथी व नॅचरोपॅथी चे असे एकात्मिक पद्धतीचे संशोधन व उपचार केंद्र उभारणार असून त्यासाठी जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांची खास मदत घेऊन चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्त या केंद्राचा शुभारंभ केला असून अद्यावत हॉलची उभारणी चालू आहे असे ब्रिगे.सुधीर सावंत म्हणाले.
डॉ.राजेंद्र पाताडे अध्यक्ष, डॉक्टर्स फ्रॅटर्निंटी क्लब या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले सर्व पॅथी मिळून एकत्रितरित्या उभारलेल्या या केंद्राची जनतेला गरज आहे. उपचारांमध्ये पंचकर्माला अतिशय महत्त्व आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल टुरिझम विकसित होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. या आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी जिल्ह्यातील डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. विद्याधर तायशेटे यांनी केंद्रासाठी शुभेच्छा दिल्या. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्री. बजरंग चव्हाण यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मंडळाच्या मुंबईमध्ये विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सभागृहात दिली व ओरोस येथे भविष्यात मंडळातर्फे विविध उपक्रम राबविणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी “खानाचा वध” या विषयावर पोवाडा सादर केला. कार्यक्रमांमध्ये फ्रॅटर्निंटी क्लब चे सचिव डॉ. सुहास पावसकर, डॉ. संदीप नाटेकर, कृषी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम रावराणे, संचालिका वरूणी सावंत,आर्किटेक योगेश सावंत, बांधकाम उद्योजक विलास येरम, कु. प्रियदर्शनी सावंत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख भास्कर काजरेकर, प्राचार्य योगेश पेडणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश परुळेकर तर आभार आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाळकृष्ण प्रभुदेसाई यांनी मांडले.
बजरंग चव्हाण
कार्यकारी विश्वस्त
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट मुंबई