जिल्हा भाजप अध्यक्षांकडून रिक्षा अपघात ग्रस्तांच्या कुटुंबांना पंचवीस हजाराची तातडीची मदत

भाजपच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार–भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू हि अत्यंत ह्रदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली.यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन झाले हेही समजू शकत नाही मन हेलावून टाकणारी अशी ही घटना आहे.अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा भागात आनंदाचे कार्यक्रम साजरे न करण्याचा निर्णय भाजप तर्फे घेण्यात आला असून ते कार्यक्रम थांबविण्यात आले असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रिक्षा अपघातात मयत चारही कुटुंबाची भेट घेऊन त्यांना पंचवीस हजारांची तातडीची मदत देवू केली.
यावेळीत्यांच्या सोबत मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर ,राजन गावकर महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री,समिर बावकर,मंदार सा़बारी,पांडुरंग वायंगणकर,राजन पांगे,अजित आचरेकर,विजय निकम,धनंजय टेमकर,रविंद्र घागरे,मंदार सरजोशी,जयंत पांगे,सिद्धार्थ कोळगे ,प्रमोद वाडेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
नारींग्रे येथे झालेल्या भीषण रीक्षा अपघातात आचरा देवूळवाडी येथील संकेत सदानंद घाडी,गाऊडवाडी येथील संतोष रामजी गावकर,रोहन मोहन नाईक आणि पिरावाडी येथील सोनू कोळंबकर या तीशीतील युवकांचे दुःखद निधन झाले होते.यामुळे रीक्षा व्यवसायावर अवलंबून असणा-या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.याबाबतची माहिती समजताच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रविवारी सायंकाळी आचरायेथे येवून संबंधित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.तसेच चारही कुटुंबांना रोख पंचवीस हजार तातडीची आर्थिक मदत देवू केली.याबाबत माहिती देताना सावंत यांनी सांगितले कि अतिशय हृदयद्रावक घटना असून या पार्श्वभूमीवर आचरा भागातील पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा परीसरात आयोजित कार्यक्रम थांबविण्यात आले आहेत या चारही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे.तीन कुटुंबात लहान मुले आहेत ज्यांना आपले वडील गेले हे समजू सुद्धा शकत नाही.अशा प्रकारचे मन हेलावून टाकणारी स्थिती आहे.या चारही कुटुंबांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांना तातडीची मदत देण्यात आली आहे.तसेच तहसीलदार, कृषी अधिकारी यांना सुचना करण्यात आल्या असून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असेल किंवा अन्य काही शासकीय योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील जेणेकरून या पिडीत कुटुंबांचे उर्वरित आयुष्य सुकर होईल तसेच रोहन नाईक यांच्या पत्नी पदवीधर आहेत त्यांच्या शिक्षणाला साजेशी नोकरी मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न राहतील असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.