सिंधुदुर्ग सहित कोकणातील भात शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा!

पालकमंत्र्यांकडून शेतकऱ्यां प्रति उदासीनता असल्याने विरोधी पक्षाकडून मागणी केल्याची शिवसेना ठाकरे गटाची माहिती

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सह शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात भात पिक हे प्रमुख पीक असून सातत्याने मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे भात पेरणी रखडली आहे. आता जमिनीतील आद्रता कमी झाल्यामुळे भात पेरणी करून ते भात लावणी योग्य येणे कठीण आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून शेतकऱ्यांची वर्षभराची रोजी रोटी यामुळे हिरावली जाणार आहे. या बाबत नुकत्याच झालेल्या आपत्ती व्यवस्थापन च्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र ती घेतलेली दिसत नाही. आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग सह कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून करण्याची गरज होती. मात्र तसे झालेले दिसत नाही अशी टीका करत विरोधी पक्ष म्हणून कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व शिष्ट मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदारांकडे निवेदन देत केली आहे. यावेळी श्री नाईक यांनी म्हटले सातत्याने पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची नुकसान झाले असून इ पीक पाहणी गतवर्षी केलेल्या शेतकऱ्यांचा आढावा घेत या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देय करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. यावेळी
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, प्रदीप सावंत, रोहित राणे, महेश कोदे, धीरज मेस्त्री, प्रतीक रसम, आशिष मेस्त्री, अजित काणेकर, आदित्य पालव, वेदांत शिवगण, जयराम शेट्ये, उद्धव पारकर लक्ष्मण हान्नीकोळ आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!