कणकवलीत बारा मे रोजी तिरंगा यात्रा

पालकमंत्री नितेश राणे करणार तिरंगा यात्रेचे नेतृत्व
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन
आपल्या भारत देशासाठी आणि भारत देशा च्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी प्रेरणा देण्याकरिता दिनांक 12 मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे करणार आहेत.
तरी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक वर्ग, रोटरी सदस्य , डॉक्टर, वकील, शाळेतील विद्यार्थी यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही तिरंगा यात्रा सकाळी ८.०० वाजता पटकी देवी मार्गे निघून तहसीलदार ऑफिस कडे रवाना होईल.