निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे रत्नागिरीमध्ये दिव्य आगमन १६ मार्चला

भक्तांमध्ये अद्भूत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण : सिंधुदुर्गमधील हजारो निरंकारी भक्त उपस्थित राहणार

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रे अंतर्गत विश्वबंन्धुत्व व एकत्वाचा दिव्य संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांचे रत्नागिरी नगरीत दिव्य आगमन होत असून त्यांच्या पावन सान्निध्यात दिनांक १६ मार्च, २०२३ रोजी सांय ५.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन रत्नागिरी येथील , उद्यमनगर शिरगांव येथील, एम. आय. डी. सी मधील चंपक मैदानावर करण्यात येत आहे.
एक दिवसीय संत समागमांची ही अविरत श्रृंखला अशीच चालू ठेवत या दिव्य युगुलाच्या पावन सान्निध्यात रत्नागिरी नंतर राज्यातील सांगली शहर तसेच गोवा राज्य येथे असेच एक दिवसीय संत समागम आयोजित केले जाणार आहेत.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित होत असलेल्या या विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमाचा आंनद प्राप्त करण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्या व्यतिरिक्त मुंबई -पुणे, कोल्हापूर, रायगड जिल्हयातून तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले सावंतवाडी, दोडमार्ग तालुका तसेच आजुबाजुच्या भागातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत. सद्गुरुंच्या दिव्य आगमनाच्या प्रति भक्तगणांमध्ये अद्भुत उत्साह व हर्षोल्हासाचे वातावरण दिसून येत आहे. निरंकारी संत समागम आज निरंकारी भक्तांसाठी एक आनंदमय उत्सव बनून राहिला आहे.निरंकारी संत समागमात प्रचारक महात्मा तसेच अन्य भक्तजन मिशनच्या संदेशाची चर्चा करतात. यामुळे श्रद्धाळू भक्तांची श्रद्धा ही द्विगुणित होतेच व पहिल्याच वेळेला आलेल्या जिज्ञासूनांही मिशनच्या उपदेशाबद्दल माहिती मिळते.
निश्चितपणे या दिव्य संत समागमांचा उद्देश मानवामध्ये मानवी मूल्यांचा संचार करुन अवघ्या विश्वामध्ये मानवतेने युक्त शांतीसुखाचे सुंदर वातावरण स्थापित करणे हाच आहे. निरंकारी मिशनच्या मते अध्यात्मिक जागृकतेद्वारे संपूर्ण मानवाला प्रेमाच्या धाग्यात बांधले जाऊ शकते.जात, रंग ,भाषा ,क्षेत्र ,राष्ट्र तसेच वेशभूषेच्या भिन्नतेची परवा न करता मानव मात्राला प्रेम तसेच परस्पर मानसन्मानाने वागवताना पाहता येते. या विशाल संत समागमाला सर्वच प्रभूप्रेमी भक्त सज्जनांनी पोहचून आध्यात्मिक क्षिधा प्राप्त करावा असे आवाहन प.पू.प्रकाश म्हात्रे -क्षेत्रीय प्रबंधक क्षेत्र क्रमांक ४० चिपळूण यांनी केले आहे.

error: Content is protected !!