अहिंसा आणि सत्याच्या आचरणाने मनुष्य निर्भय होतो – विजय चौकेकर

महात्मा गांधींजींनी आपल्या जीवनात अहिंसेचा मार्ग स्विकारला . तसेच त्यांचे वर्तन सत्याचे आचरण करणारेच होते आणि सत्य हे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केल्यानेच प्राप्त होते . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .
आर . पी . डि. बागवे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मसूरे ता . मालवण येथे महात्मा गांधींच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानात ते बोलत होते .
यावेळी त्यांच्या समवेत विचारमंचावर प्रशालेच्या मुखाध्यापिका अर्चना कोदे मॅडम व स्कूल कमिटी सदस्य विठ्ठल लाखम सर उपस्थित होते .
यावेळी विजय चौकेकर यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन वैष्णव जन तो तेने कहिए जे । पीड़ पराई जाणे रे । म्हणून दाखविले . दुसर्यांचे दुःख समजून घेऊन दुसऱ्यांवर केलेल्या उपकाराचा कोणताही अभिमान बाळगू नका असे सांगितले .
शासनाने मंजूर केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या बारा कलमांची प्रात्यक्षिकांसह मुलांना माहिती दिली . काही प्रात्यक्षिके मुलांकडून करून घेतली .कोणत्याही घटनेमागील कार्यकारणभाव जाणून घेतल्यानंतरच अंतिम सत्य माणसाला समजून येते . श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक समजून घेऊन समाजात असलेल्या विविध अंधश्रद्धा माणसाचे कसे नुकसान करतात आणि याचा फायदा जादूटोणा करणारे भोंदूबाबा कसा उठवितात आणि आपले शारीरिक , मानसिक , आर्थिक आणि लैगिक शोषण कसे करतात हे उदाहरणाद्वारे समजावून दिले . हातचलाखी आणि दोन रासायनिक संयुगाद्वारे चमत्कार करून आणि जादूटोणा करून स्वतः मध्ये दैवी शक्ती असल्याचा आव आणणार्या भोंदू बाबां पासून सावध राहून स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करा आणि असे भोंदूबाबा समाजात आढळल्यास तात्काळ दक्षता अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असेही आवाहन केले .
यावेळी इ . पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला .
यावेळी प्रशालेचे शिक्षक पाताडे सर , भरत ठाकूत सर , तळाशिलकर मॅडम , भोगले मॅडम , जाधव मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

सितराज परब (मसुरे वार्ताहर )

error: Content is protected !!