ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवली मतदारसंघातील समस्यांची आठवण झाली नाही काय?

भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे यांचा सवाल
वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी त्रिकुटाचा केविलवाणा प्रयत्न
शिवसेनेच्या वतीने कणकवली विधानसभा मतदार संघात आरोग्य शिबिर सुरु असून या आरोग्य शिबिरांमध्ये शिवसेनेच्यावतीने आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटर वर असून राज्य सरकार आरोग्य यंत्रणा सुधारण्यात अपयशी ठरली असे आरोप करत असताना जिल्हातील आरोग्य यंत्रणेवर टीका करून केवळ राजकीय भांडवल करत आहेत. गेली अडीज वर्षे शिवसेना (उबाठा) हि सत्तेत होती. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना कणकवली विधानसभा मतदार संघामधील आरोग्य यंत्रणेची आठवण झाली नाही का ?
डॉक्टर असतील किंवा अपूरा स्टाफ असेल तसेच लागणारी मशनरी असतील हे सत्तेत असताना करू शकले नाही. आता केवळ आरोप करून आपल्या वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी शिवसेनेतील त्रिकुटांचा केविलवाणा प्रयत्न आहे.
सध्या आरोग्य शिबिर भरवताना लागणारी यंत्रणा हि शासनाची असून प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी, तिथला स्टाफ तसेच ऑपरेशन हि जिल्हा रुग्णालयात करत आहे. असे असताना एकीकडे राज्य सरकारवर व स्थानिक आमदार व आरोग्य यंत्रणेवर टीका करायची व व्हेंटीलेटर वरची आरोग्य यंत्रणा सांगून त्याच आरोग्य यंत्रणेचा वापर करून आरोग्य शिबिर घ्यायची. जर आरोग्य यंत्रणा सक्षम नाही तर शासकीय यंत्रणा वापरून शिबिर का भरवता ? यावरून असे लक्षात येते कि आरोग्य यंत्रणेवर टीका करून त्याच आरोग्य यंत्रणेला हाताशी धरून शिबिर घ्यायची. आमदार नितेशजी राणे यांनी अपुरा स्टाफ उपजिल्हा रुग्णालयाला देऊन डॉक्टर व रुग्णांची होणारी गैरसोय दूर केली. तसेच जिल्हा नियोजनमधून दुरुस्ती साठी निधी आणला. उपजिल्हा रुग्णालयातील होणारी ऑपरेशन हि CRM मशीन नसल्यामुळे रुग्णांना ऑपरेशन हि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करावी लागत होती. हि बाब आमदार नितेश राणे यांनी लक्षात घेवून जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून होणारी गैरसोय दूर केली. केवळ आंदोलन आणि उपोषण करायची व बातम्या लावून वाहवा मिळवण्यासाठी असे काही काम शिवसेनेच्या त्रिकुटाकडे राहिले नाही. ज्या आरोग्य यंत्रणेची बदनामी करता त्याच जि.प. विभाग व जिल्हाच्या शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत शिबिर राबवता याचा अर्थ आपण जाणूनबुजून बदनामी करता हे सिद्ध झाले.असा टोला भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व शहराध्यक्ष आण्णा कोदे यांनी लगावला आहे.
कणकवली प्रतिनिधी