जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा – अतुल बंगे

गव्या रेड्यांपांसुन भात शेतीचे संरक्षण करा – अमरसेन सावंत

प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या अवकृपेमुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे. तर भात शेतीपासुन गव्या रेड्यांना आवर घालावा अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे.
गेले बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. केलेल्या शेतीची नासधुस गवेरेडे करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरयांच्या चिंता वाढल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे नसुन धनदांडग्यांचे सरकार असल्याने गरीब शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याची खंत श्री बंगे व श्री सावंत यांनी व्यक्त केली आहे.
उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र सध्या सत्तेतील कोणीही सहकार्य करत नसुन शेतकरी विवंचनेत सापडला आहे,. गव्या रेड्यांपांसुन शेतकरी भयभित झाले असताना याला उपाय म्हणून काहीच करु शकत नाही अशी परीस्थिती निर्माण झाली आहे असेही श्री बंगे व श्री. सावंत यांनी सांगितले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!