
आचरा पंचक्रोशीत गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित असून यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय झाली आहे.
संतप्त बनलेल्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्या नेतृत्वाखाली आज येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या चार दिवसात वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर न केल्यास माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक, ग्रामस्थांचा महावितरणवर…










